3000 रुपयांचा पास एकदाच काढून तुम्ही वर्षभर टोल न भरता फिरू शकता. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारीत एक स्कीम लाँच केली आहे. यामध्ये 3000 रुपयांचा पास काढून तुम्ही टोल भरण्याच्या कटकटीपासून वाचू शकता. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. ही योजना संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करण्यात येणार आहे.
advertisement
3000 रुपयांमध्ये चालकाला 200 ट्रिप करता येतील अशी अट ठेवण्यात आली आहे. ही योजना नॉन कमर्शियल, खासगी वाहनं, कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 3000 रुपये किंमतीचा फास्ट टॅग पास सुरू करण्यात येणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्याशिवाय प्रवास सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोल प्लाझावर वाहनांची गर्दी होऊ नये, वाहतूक कोंडी टाळणं आणि वेळ वाचवणे यासाठी हे पर्याय देण्यात आले आहेत. वार्षिक पास योजना लाखो खाजगी चालकांसाठी जलद, सुरळीत आणि चांगल्या प्रवास अनुभवासाठी सुरू करण्यात येत आहे. एकदाच पैसे भरायचे, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझावर हे चालणार आहे.या योजनेमुळे केवळ पैसे वाचणार नाहीत तर तुमचा वेळ आणि प्रवासाचा अनुभवही सुधारेल. देशभरातील टोल प्लाझावरील जाम, फास्टॅग स्कॅन आणि वारंवार पेमेंट करण्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.
हा नवीन पास राजमार्ग यात्रा ॲप (Rajmarg Yatra App) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अधिकृत वेबसाइट्सद्वारे उपलब्ध होणार आहे. सरकारकडून लवकरच यासंबंधीची अधिकृत लिंक जाहीर केली जाईल.
पासचा सर्वाधिक फायदा दररोज ऑफिस किंवा व्यवसायानिमित्त राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना होईल. यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वेळेची बचत होईल. याव्यतिरिक्त, लांबच्या प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठीही हा पास एक उत्तम संधी आहे.
हा नवीन पास राजमार्ग यात्रा ॲप (Rajmarg Yatra App) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अधिकृत वेबसाइट्सद्वारे उपलब्ध होणार आहे. सरकारकडून लवकरच यासंबंधीची अधिकृत लिंक जाहीर केली जाईल.
पासचा सर्वाधिक फायदा दररोज ऑफिस किंवा व्यवसायानिमित्त राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना होईल. यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वेळेची बचत होईल. याव्यतिरिक्त, लांबच्या प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठीही हा पास एक उत्तम संधी आहे.
टोल प्लाझावर होणारी गर्दी आणि तासंतास ट्रॅफिकमध्ये उभे राहण्याची गरज संपेल. तसेच, वारंवार फास्टॅग वॉलेट रिचार्ज करण्याच्या त्रासातूनही सुटका होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे टोल संकलनात अधिक पारदर्शकता येईल आणि टोल संबंधीचे वाद मोठ्या प्रमाणात कमी होतील. फक्त ३,००० रुपयांमध्ये एक वर्षाचा हा टोल पास मिळवून तुम्ही तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचवू शकाल.