दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत. तर अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी होणार नाही. मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये अर्जांची छाननी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत तिथे अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी पुन्हा सुरू झाली आहे.
advertisement
Ladki Bahin Yojana: निवडणुकीनंतर पहिला धक्का, पुण्यात 10 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आली आहे. ही योजना महायुतीसाठी खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरली खरी मात्र आता याच योजनेतील निकष आणि लाभार्थी महिलांचे अर्ज, कागदपत्र पुन्हा तपासले जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचं, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेजही फिरत आहेत. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये असं स्पष्टच सांगितलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माहितीची योग्य ती पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असं त्यांनी सांगितलं. निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज किंवा व्हिडीओवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महिलांना केलं आहे.
Ladki Bahin Yojana: 'या' तारखेला खात्यावर येणार पैसे? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट