2025 मध्ये सुरू झालेल्या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांनी ४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवल गमावले आहे. 1996 मध्ये स्थापन झालेल्या निफ्टी 50 निर्देशांकाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली आहे. मात्र, झेरोधाचे निखिल कामत यांनी या घसरणीला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
फुगा तर फुटणारच होता! 1929 सारखं पुन्हा घडायला नको, रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाने व्यक्ती केली भीती
नकारात्मकतेला भुलू नये
कामत यांनी या घसरणीचे वर्णन "कोविड महामारीनंतरची पहिली खरी बाजार सुधारणा" असे केले आहे. ते म्हणाले, "बाजारपेठा चक्रीय असतात. 2020 च्या अखेरीपासून ज्या वेगाने शेअर बाजार वाढत होता, त्यामुळे ही घसरण अपरिहार्य होती. गुंतवणूकदारांनी बाजारातील नकारात्मकतेला भुलू नये आणि आपल्या एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू ठेवावी." कामत पुढे म्हणाले, "मला खात्री नाही की उपलब्ध डेटा किती अचूक आहे, पण असे दिसत आहे की एसआयपी थांबवणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे, आणि हे चुकीचे आहे. एसआयपी तुम्हाला विविध बाजार चक्रांमध्ये सरासरी परतावा मिळवण्यास मदत करते."
SIP Plan: दरमहा 10,000 रुपये गुंतवून त्याचे 2 कोटी व्हायला दिवस लागतील?
2008 च्या संकटाचा इशारा देणाऱ्या तज्ज्ञाचे मत
एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अॅलेथिया कॅपिटलचे जिम वॉकर, ज्यांनी 2008 च्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती, त्यांनीही भारतीय बाजारपेठेबाबत सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे. वॉकर यांनी स्पष्ट केले की सध्याची घसरण 2008 च्या आर्थिक संकटासारखी नाही. त्यांनी जागतिक मंदीचे अस्तित्व मान्य केले, परंतु सध्याच्या परिस्थितीची तुलना दशकभरापूर्वीच्या आर्थिक संकटाशी करता येणार नाही, असे नमूद केले. वॉकर म्हणाले, "मी माझ्या क्लायंटना भारतातील गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला आहे. जरी सध्याच्या बाजार मूल्यात काही शंका असल्या तरी लवकरच आर्थिक वाढ त्यांना योग्य ठरवेल आणि कंपन्यांची कमाई वाढेल."
भारत की चीन – कुठे गुंतवणूक करावी?
वॉकर यांनी भारताला गुंतवणुकीसाठी चीनपेक्षा अधिक योग्य पर्याय मानले आहे. त्यांच्या मते, गेल्या तीन दशकांतील ही सर्वोत्तम गुंतवणूक संधी आहे. ते म्हणाले, "गेल्या 30 वर्षांत भारताची धोरणात्मक स्थिरता आणि धोरणांची निश्चितता शिखरावर आहे. भारत सरकारचे नियंत्रणमुक्तीकरण आणि व्यवसाय-अनुकूल सुधारणा भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचे उत्प्रेरक ठरतील." वॉकर यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना (SME) प्रोत्साहन देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. "या क्षेत्रावर भर दिल्यास आर्थिक विस्तार आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल, आणि त्यामुळे शेअर बाजारही चांगली कामगिरी करेल."