मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ जवळ आज सकाळी सुमारे १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका २७ वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली. संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात असून, ट्रेन येण्याच्या आधीच ती रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
बऱ्याचवेळ रेल्वे स्टेशनवर उभी होती तरुणी
सकाळच्या गर्दीच्या वेळी मीरा-भाईंदर परिसरातून मोठ्या संख्येनं नोकरदार मुंबईकडे प्रवास करत असतात. संबंधित २७ वर्षीय तरुणीही भाईंदर रेल्वे स्थानकावर बऱ्याच वेळापासून उभी होती. लोकल समोर येताना पाहून तिने ट्रॅकवर उडी टाकली आणि रुळावर झोपली. धावत्या लोकलखाली सापडून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. धक्कादायक म्हणजे, रेल्वे स्थानकावर यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पण, सगळ्यांच्या समोर ही घटना घडली. या घटनेमुळे फलाट क्रमांक 2 वरील रेल्वे सेवा काही काळासाठी खोळंबली होती.
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. सध्या मृत तरुणाची ओळख पटलेली नसून त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतं. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
