मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात हवाई वाहतुकीसाठी व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळावर दोन विमानाची धडक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची ही धडक झाली आहे. दोन्ही विमानाची पंखं एकमेकांना घासली आहे. सुदैवाने दोन्ही विमानांचाा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप आहे. या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचं किरकोळ नुकसान झालं आहे.
advertisement
अधिक माहिती अशी की, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडियाचं विमान AI2732 हे उड्डाणासाठी रनवेकडे जात होतं. तर त्याचवेळी इंडिगोच्या एका विमान लँडिंग झालं होतं. हे विमान टॅक्सी वे 'B1' ला जोडण्यासाठी टॅक्सिंइंग करत होतं. त्यावेळी दोन्ही विमानांच्या उजव्या पंखांची टोकं एकमेकांना घासली. अपघाताच्या वेळी दोन्ही विमानं हे रनवेकडे धीम्या गतीने जात होती. त्यावेळी ही घटना घडला. या घटनेनंतर दोन्ही विमानं थांबवण्यात आली. विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं आहे. दोन्ही विमानं दुरुस्तीसाठी रवाना झालीआहे. या प्रकरणी डीजीसीएने चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
इंडिगोचं स्पष्टीकरण
इंडिगो एअरलाईन्सकडून खुलासा करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट 6E 791 च्या विमानाचे पंखे लँडिंगच्या वेळी एअर इंडियाच्या विमानाला घासले गेले. या दुर्घटनेमध्ये सर्व प्रवासी सुरक्षित आहे. विमानं पार्क केल्यानंतर सगळ्या प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त विमानाची तपासणी सुरू आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्याची माहिती तातडीने देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. असं इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आलं.
