जोगेश्वरी पूर्वेच्या जय जवान गोविंदा पथकात 500 हून जास्त गोविंदा आहेत. या मंडळाचा सराव दहीहंडीच्या दोन महिने आधीच सुरू होतो. यंदा 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी आहे. त्यामुळे या पथकाच्या तयारीनं वेग पकडलाय. पथकाचे समन्वयक विजय निकम यांनी या मंडळाचं यंदा काय लक्ष्य आहे हे सांगितलंय.
सुनेसाठी सासूच ठरली लाईफ लाईन, किडनी देऊन दिला नवा जन्म
advertisement
'जय जवान गोविंदा पथकाची स्थापना 2000 साली संदीप ढवळे यांनी केली. सुरुवातीला या पथकात फक्त 15 ते 20 गोविंदा होते. पाच थरांपासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. मुंबई उपनगरात त्यावेळी आठ थर लावणारं गोविंदा पथक होतं. 2008 साली ठाण्यातल्या वर्तक नगरमध्ये आम्ही नऊ थर लावून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.
ईस्ट ऑर वेस्ट डोंबिवलीत काय आहे बेस्ट?
वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं लयबद्धरित्या कमीत कमी वेळांमध्ये थड लावण्याचं प्रात्याक्षिक जय जवान पथकानं जगासमोर ठेवलं आहे. 2008 साली 9 थर लावल्यानंतर गेल्या 15 वर्षांंमध्ये आम्ही आजवर 31 वेळा नऊ थर रचले आहेत. आमचं मंडळ दहा थर लावण्यात यशस्वी होईल, अशी संपूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे. साहजिकच या वर्षी देखील आम्ही दहा थर लावण्याच्या निर्धारानं मैदानात उतरणार आहोत, असं निकम यांनी सांगितलं.