मुख्य कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून देशभरात इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम हा गॅस तुटवड्याच्या दिशेने दिसत आहे. त्यातच लालबागमधील प्रसिद्ध लाडू सम्राट उपहारगृहाला बुधवारी गॅस टंचाईमुळे ते बंद करावे लागेल. या उपहारगृहाची ओळख म्हणजे दररोज हे 10,000 वडापाव विकत होते मात्र या पाठोपाठ आता दादरमधील आदर्श उपहार गृह तर परळ परिसरातील काही छोटी-मोठी हॉटेल्स गॅस पुरवठ्यामुळे बंद झालेली आहेत.
advertisement
रुग्णांच्या नातेवाईकांसमोर मोठे संकट
हॉटेल्स नंतर या टंचाईचा मोठा फटका मुंबईतील केईएम आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाबाहेर जेवण करणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना बसत आहे. स्वस्त दरात थाळी देणारी अनेक हॉटेल्स बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक हॉटेल मालक आता इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय शोधत आहेत परंतु मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी हे पर्याय पुरेसे ठरत नाहीत.
हॉटेल बंद, आता जगायचे कसे
या संकटाचा सर्वात गंभीर परिणाम हॉटेल कामगारांवर झाला आहे. अनेक कामगार परराज्यातील असून काम बंद राहिल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पुढील तीन ते चार दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाह तर या कामगारांवर गावी परतण्याची वेळ येऊ शकते.
