तासाभरांचा प्रवास आता किती वेळात होणार?
मिरा-भाईंदर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना साधारण एक तास लागतो मात्र आता या मेट्रोमुळे हा प्रवास आता अवघ्या 30 मिनिटांतच पूर्ण होणार आहे. फडणवीस यांनी पुढे सांगितले की,साईबाबा नगर ते सुभाष चंद्र नगर या दुसऱ्या टप्प्याचे साधारण 96 टक्के काम पूर्ण झाले असून याच वर्षी 4.3 किमीची ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
advertisement
मेट्रो 7 आणि मेट्रो 3 ची जोडणी
या नव्या मेट्रो प्रकल्पाचे एक मोठी गोष्ट म्हणजे तिचे नेटवर्क, कारण ही मार्गिका आता मेट्रो 7 ला जोडली गेली आहे आणि पुढे ती मेट्रो 3 लाही अंडरग्राउंड जोडली जाणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना आता थेट कुलाबा गाठता येणार आहे शिवाय वन कार्ड सेवेमुळे प्रवाशांना एकाच कार्डवर संपूर्ण मुंबईत प्रवास करता येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो असून ती पूर्णपणे हरित प्रकल्प म्हणून विकसित केलेली आहे. सौर ऊर्जा तसेच एलईडी लाइटिंगचा वापर यात करण्यात आलेला असून खास म्हणजे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच पिलरवर उभे करण्याचे आधुनिक असे तंत्रज्ञान येथे वापरण्यात आले आहे.येत्या 3 ते 4 वर्षांत मुंबईचे मेट्रो जाळे हे दिल्ली शहराच्या मेट्रो जाळ्यापेक्षा मोठे नक्की होईल आणि मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वॉटर मेट्रो देखील येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा आज दिमाखात शुभारंभ
मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचा शुभारंभ काही वेळात होणार आहे. हा प्रकल्प ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा असून यामुळे ठाणे आणि बोरिवली शहरातील अंतर कमी होणार आहे शिवाय ठाणे शहरातील घोडबंदर भागातीलही वाहतककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
प्रकल्पाची वैशिष्ट कोणती
या दुहेरी बोगद्या हा प्रकल्प साधारण 11.84 किमी लांबीचा असून त्यापैंकी 10.25 किमीचा मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा असेल शिवाय या बोगद्यात दोन समांतर असे रस्ते बांधले जातील आणि हा बोगदा पूर्णपण जमिनीखालून जाणार असणार आहे.
