नेमका प्रकार घडला काय?
मिळालेल्या माहितीनुसार,भिवंडीतील चाविंद्रा येथील भागात विलास पाटील यांच्या ही मालकीची जागा आहे. या जागेत असलेल्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या आहेत. त्यामुळे अवचितपाडा येथील चार मुले या कैऱ्या तोडण्यासाठी गेले होते. ही मुलं कैऱ्या तोडत असल्याचे मालक विलास पाटील यांनी पाहिले आणि त्यांचा पारा चढला. विलास यांनी कोणताही विचार न करता त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्या मुलांचा पाठलाग गेला आणि त्यांना पकडून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.
advertisement
मुलांची प्रकृती चिंताजनक
मालकाने केलेली ही मारहाण इतकी भीषण होती की चारही मुले बेशुद्ध पडले. यामध्ये एका मुलाचा पायही फॅक्चर झाला असून तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी सर्व प्रकार पाहताच मुलांना तातडीने एका रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातकाळ दखल घेत मुख्य आरोपी विलास पाटीलवर गुन्हा दाखल केला आहे.
