TRENDING:

Palghar Accident: वाघोबा खिंडीत भीषण अपघात! 3 तरुणांचा जागीच जीव गेला; अज्ञात वाहनाने उडवले अन्...

Last Updated:

अपघात करून पळून गेलेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी मनोर पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसर पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की धडक लागताच दुचाकीचा चक्काचूर झाला आणि तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंडीतून दुचाकीवरून तीन तरुण प्रवास करत होते. यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात जड वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनी या घटनेची माहिती तात्काळ महामार्ग पोलिसांना दिली.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू 

advertisement

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मनोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटली नसून सध्या त्यांच्याकडील कागदपत्रे आणि दुचाकीच्या क्रमांकावरून पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

फरार चालकाचा शोध सुरू 

advertisement

अपघात करून पळून गेलेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी मनोर पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. वाघोबा खिंड परिसर हा अपघातांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानला जातो, त्यातच अज्ञात वाहनांच्या वेगामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात 

advertisement

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. पालघरच्या वऱ्हई येथे तीन वाहन एकमेकांना धडकली . राष्ट्रीय महामार्गावरच स्पीड ब्रेकर टाकल्याने अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर टाकता येत नसताना देखील नियम डावलून ठेकेदाराकडून स्पीड ब्रेकर बसवले आहेत नदीवरील पुलाच काम सुरू करण्यासाठी स्पीडब्रेकर टाकल्याचा ठेकेदाराने दावा केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्गाकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून शुक्रवारी संध्याकाळपासून याच ठिकाणी चार ते पाच अपघात झाल्याची स्थानिकांची माहिती आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत काय आहे? नववी नापास पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video
सर्व पहा

एक दोन नाही 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या, कुठे आणि कसा झाला अपघात, पाहा PHOTO

मराठी बातम्या/मुंबई/
Palghar Accident: वाघोबा खिंडीत भीषण अपघात! 3 तरुणांचा जागीच जीव गेला; अज्ञात वाहनाने उडवले अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल