जाणून घेऊया या रंजक भाजीविषयी...
मालती देवींनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलांचलमध्ये जावयाच्या ताटात कितीही व्यंजन वाढले असले, मात्र जर ताटात तिलकोरकाची भाजी नसेल तर अतिथीच्या सत्कारात कमी असल्याचं मानलं जातं. तिलकोरला खूप महत्त्व असतं. जितकी ही पानं दिसायला सुंदर असतात त्याहून अधिक खायला चवदार असतात. कुरकुरीत असल्याकारणाने या पानांची वेगळीच चव येते.
advertisement
'या' मंदिरात करा पूजा आणि काळजी सोडा, नोकरी मिळालीच म्हणून समजा!
अशी बनवतात भजी...
सर्वसाधारण दिसणारी ही पानं जंगलात किंवा झाडांमध्ये मिळतात. मालती देवींनी दिलेल्या माहितीनुसार, ही भजी बनवणं खूपच सोपं आहे. खासकरून जावयासाठी या पांनीची भजी बनवली जाते. सर्वात आधी तांदूळ वाटून त्याचं पीठ तयार केलं जातं. यानंतर हळदीसह काही मसाले एकत्र करून पेस्ट केली जाते. यानंतर ही विशेष पानं त्यात घोळवून तळली जातात. ही पानं खाल्ल्यामुळे आजारांपासून सुटका होत असल्याची मान्यता आहे.