भारतीय हवाई दलाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं हवाई दलानं मोठं वक्तव्य केलंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला मोठं यश मिळाल्याचा दावाही हवाई दलानं केलाय. हवाई दलानं एक्सवर पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिलीय.ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ते अजूनही सुरू आहे .
काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश?
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यासा स्पष्ट सांगितले आहे की, जर तिथून गोळी आली तर इथूनही गोळी झाडली जाईल. हा संदेश पाकिस्तानला स्पष्ट आहे की कोणताही हल्ला आता सहन केली जाणार नाही. सूत्रांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जर पाकिस्तानने आणखी हल्ला केला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल. जर त्यांनी गोळीबार केला तर आम्ही गोळीबार करू आणि जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही हल्ला करू.
पाकिस्तानने कारवाई केली तर त्याचे भयानक परिणाम होतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी बेन्स यांना स्पष्ट सांगितले होते की, जर पाकिस्तानने कारवाई केली तर त्याचे भयानक परिणाम होतील. यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून 9 आणि 10 मे च्या सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले.
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा
10 मे रोजी 5 वाजल्यापासून युद्धबंदी करार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु संध्याकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ले सुरू केले. पण, भारताने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळत आहे. रशिया आणि जपान यांनी उघडपणे भारताच्या बाजूने समर्थन जाहीर केले आहे, तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे.