स्थानिक रहिवाशांच्या मते, हे स्फोट त्याच ठिकाणी आणि त्याच पॅटर्ननुसार झाले, जिथे दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे आवाज ऐकू आले होते. यापूर्वी, जैसलमेरच्या लाठी भागात तीन मोठे स्फोट ऐकू आले होते. हे स्फोटे इतके भयंकर होते की, याचा आवाज तब्बल ५० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. त्याचप्रमाणे पोखरणमधील धंधू, उग्रस आणि सातवार या गावात स्फोट झाल्याची माहिती मिळाली, जिथे क्षेपणास्त्रासारखी वस्तू पडल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
या घटनांनंतर, जैसलमेरसह राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री ८:३० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत संपूर्ण वीज बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्यामध्ये घरांचे लाईट बंद ठेवण्याचे आणि अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानने अलीकडेच युद्धबंदी करारावर सहमती दर्शवली होती, परंतु त्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे वृत्त समोर आले. युद्धबंदीचा करार केल्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा एकदा पाकिस्तानकडून हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढताना दिसत आहे.