१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईक करत क्षेपणास्त्र डागले आहे. बहावलपूर येथील अतिरेकी शिबीर जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद चालवत होता. याच अतिरेकी शिबिराला भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यभेद केलंय.
पाकिस्तानचे तथाकथित अभिमान असलेले एफ-१६ हे लढाऊ विमान नियंत्रण रेषेजवळ भारतीय हवाई दलाने पाडले. पाकिस्तानचे हे विमान पाडून भारतीय लष्कराने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
advertisement
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात 'ऑपरेशन सिंदूर'चा उद्देश फक्त दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करणे होता, असे म्हटले आहे.
भारताच्या हल्ल्यात १४ दहशतवाद्यांचा खात्मा
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यात १४ अतिरेकी ठार झाले आहेत तर ७० हून अधिक अतिरेकी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनांची शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूर परिसरात इर्मजन्सी अर्थात आणिबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.