TRENDING:

कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी का फोडला जातो नारळ, प्रथेमागचं नेमकं कारण काय?

Last Updated:

भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा अगदी नवीन गाडीची खरेदी असो, 'नारळ' फोडल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. नारळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले असून त्याला 'श्रीफळ' म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हटले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hindu Rituals : भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा अगदी नवीन गाडीची खरेदी असो, 'नारळ' फोडल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. नारळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले असून त्याला 'श्रीफळ' म्हणजेच लक्ष्मीचे फळ म्हटले जाते. मात्र, शुभ कार्यापूर्वी नारळ फोडण्याची ही प्रथा केवळ परंपरेचा भाग नसून, त्यामागे खोलवर रुजलेली आध्यात्मिक आणि मानसिक कारणे आहेत.
News18
News18
advertisement

मानवी अहंकाराचे प्रतीक

नारळ फोडण्याच्या प्रथेमागे एक मोठा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. नारळाचे बाहेरील कवच अत्यंत कठीण असते, तर आतील भाग पांढरा, मऊ आणि शुद्ध असतो. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात नारळाचे कठीण कवच हे मानवी 'अहंकाराचे' प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण देवाच्या चरणी किंवा शुभ कार्यापूर्वी नारळ फोडतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार मोडून काढत आहोत आणि आपले अंतर्मन देवाच्या चरणी अर्पण करत आहोत. जोपर्यंत माणसाचा अहंकार फुटत नाही, तोपर्यंत त्याला ईश्वरी ज्ञान आणि शांती मिळत नाही, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.

advertisement

'बळी' प्रथेला दिलेला सात्विक पर्याय

प्राचीन काळी अनेकदा शुभ कार्या सिद्धीस नेण्यासाठी प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती. मात्र, काळानुसार जसा मानवाचा वैचारिक विकास झाला, तशी ही हिंसक प्रथा बंद होऊन त्याला एक सात्विक पर्याय शोधण्यात आला. ऋषीमुनींनी नारळाची रचना मानवी कवटीशी मिळतीजुळती असल्याचे मानले. त्यामुळे प्राण्यांच्या बळीऐवजी नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. यामुळे रक्ताऐवजी 'शुद्ध पाणी' अर्पण करून कार्याची सुरुवात अधिक पवित्र मानली जाऊ लागली.

advertisement

सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि शुद्धता

विज्ञानाच्या दृष्टीनेही नारळाच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नारळाच्या आतले पाणी हे जगातील सर्वात शुद्ध पाणी मानले जाते, कारण ते निसर्गाकडून पूर्णपणे सीलबंद असते. जेव्हा आपण नारळ फोडतो, तेव्हा त्यातील पाणी जमिनीवर किंवा परिसरात विखुरले जाते. असे मानले जाते की, नारळ फोडल्याने त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात सकारात्मक लहरी निर्माण होतात. यामुळे नवीन कार्याला कोणत्याही विघ्नाशिवाय गती मिळते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी का फोडला जातो नारळ, प्रथेमागचं नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल