३१ जानेवारी १९७३ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात अंकुश चौधरीचा जन्म झाला. चाळीत वाढलेल्या अंकुशचा चित्रपटसृष्टीपर्यंतचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. घराची परिस्थिती तशी बेताची असल्याने, कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून अंकुश भाजी विकायचा. पण अभिनयाप्रती असलेल्या आवडीमुळे तो चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी भाग घ्यायचा. इथूनच त्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
advertisement
शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून अंकुशला पहिली मोठी संधी मिळाली. या कार्यक्रमात अंकुश अनेक कलाकारांसोबत शेवटच्या रांगेत नृत्य करायचा. याच कार्यक्रमादरम्यान अंकुशची भरत जाधव, केदार शिंदे व संजय नार्वेकर या कलाकार मित्रांशी ओळख झाली. केदार शिंदेसोबत अंकुशने अनेक एकांकिका केल्या. त्याच्या 'ऑल द बेस्ट' या नाटकानेच अंकुश चौधरीला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली.
Alia Bhatt : जर्मनीत पुर्वज, हिटलरसोबत खास नातं, आलिया भट्टला कशी मिळाली ब्रिटिश नागरिकता?
कॉलेजला असताना अंकुशची दीपाशी भेट झाली. दीपा परब आणि अंकुश चौधरी यांचे शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झाले. दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले होते. अंकुश चौधरी आणि दीपा परब एकमेकांना १० वर्षे डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये लग्न केले होते. आज त्यांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
अंकुशने 'सावरखेड एक गाव', 'आई शपथ', 'मातीच्या चुली', 'यंदा कर्तव्य आहे', 'संशय कल्लोळ', 'चेक मेट', 'गैर', 'ब्लफमास्टर', 'डबल सीट', 'क्लासमेट', 'गुरु', 'दगडी चाळ' आणि 'दुनियादारी'सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
