सव्वा एकर मिरचीतून 8 लाखांची कमाई, शेतकऱ्यानं कसं केलं नियोजन?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
भंडाऱ्यातील लेकराम यांचा धानाच्या पट्ट्यात मिरची शेतीतील यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
1/7

पारंपारिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. सध्याच्या काळात शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांकडे शेतकरी वळताना दिसतायेत.
advertisement
2/7
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात पारंपरिक धान शेती केली जाते. पण किटाडी येथील शेतकरी लेकराम चौधरी यांनी पारंपरिक धान शेतीला फाटा देत मिरचीची लागवड केली.
advertisement
3/7
सव्वा एकर मिरचीच्या शेतीतून त्यांना 8 लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळेच तिखट मिरचीने आता लेकराम यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.
advertisement
4/7
भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथील लेकराम चौधरी या शेतकऱ्याने कमी पाणी आणि कमी खर्चात मिरचीच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. किटाडी येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या पारंपरिक धानाची शेती करतात. मात्र, या शेतीतून हवा तेवढा नफा मिळत नाही.
advertisement
5/7
अनेकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून कमी पाण्याची व कमी खर्चाच्या शेतीसाठी लेकराम यांनी मिरचीच्या शेतीचा वेगळा पर्याय शोधला.
advertisement
6/7
लेकराम यांनी सव्वा एकर जागेत मिरचीची लागवड केली. यातून त्यांना तब्बल 8 लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर अनंद फुललाय.
advertisement
7/7
लेकराम यांचा धानाच्या पट्ट्यात मिरची शेतीतील यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे अपयशाने किंवा नुकसान झाल्याने खचून न जाता नव्याने योग्य पर्याय निवडून केलेली मेहनत नक्कीच फळाला येते हेच यातून सिद्ध होतंय.(अमिता शिंदे, प्रतिनिधी)