महाराष्ट्र तापला! गरज असेल तरच बाहेर पडा; उष्णतेच्या लाटेनंतर पावसाचाही अलर्ट, हे शहर ठरलं हॉट सिटी'
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather alert: भारतीय शहरे ‘अर्बन हीट आयलंड’ बनत चालली असून ग्रामीण भागापेक्षा शहरांत तापमान अधिक जाणवत आहे, असा इशारा सीएसईच्या अहवाल आहे.
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. गुरुवारी राज्यातील 6 शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार राहिला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे देशातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
देशातील हवामानात देखील मार्चमध्ये मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर भारतासह अनेक राज्यांत पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भ, कर्नाक आणि केरळमध्ये देखील ‘यलो अलर्ट’ दिला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement








