KKR vs PBKS : पावसामुळे केकेआर वाचली पण Ajinkya Rahane ची एक चूक कुणाच्याच लक्षात आली नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajinkya Rahane Mistake In KKR vs PBKS : कोलकाता आणि पंजाब किंग्ज यांच्यातील झालेल्या सामन्यात पावसाने गेम केला अन् दोन्ही टीम्सला 1-1 पाईंट्स विभागून देण्यात आले. पण यावेळी अजिंक्य रहाणेने मोठी चूक केली.
advertisement
1/7

आयपीएल 2026 च्या 12 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील मॅचमध्ये पावसाने खोडा घातल्याने सामना होऊ शकला नाही. सामना अनिर्णयित राहिला.
advertisement
2/7
ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये दोन्ही टीम्सना 1-1 पॉईंट देण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा केकेआरने 3.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 25 रन्स केले होते.
advertisement
3/7
पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी अजिंक्य रहाणे 8 रन्सवर खेळत होता. पण टॉस झाल्यावर अजिंक्य रहाणे याने जी घोडचूक केली, त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
advertisement
4/7
अजिंक्य रहाणेच्या निर्णयावर क्रिडाविश्वातील दिग्गज चकित झाले होते. एवढंच काय तर टीम इंडियाचा माजी खेळाडू आर आश्विनने देखील अजिंक्य रहाणेच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं.
advertisement
5/7
हा निर्णय म्हणजे टॉस जिंकून बॅटिंग करायचा. पावसाचं वातावरण असताना दोन दिवस सलग पाऊस आहे, हे माहित असताना देखील अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
6/7
कोलकाताच्या पीचवर दुसऱ्या डावात बॉलिंग करणं म्हणजे मोठ्या जिकारीचं काम... ज्यामुळे मॅच देखील हातातून जाऊ शकते. अशातच रहाणेने हा धाडसी निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
7/7
दरम्यान, कोलकात्यामध्ये हार्ड रोलिंग मशीन नाही, त्यामुळे पावसाचं पाणी काही काळ मैदानात तसंच राहतं. ही गोष्ट रहाणेला माहिती असून देखील त्याने घेतलेला निर्णय पंजाब किंग्जसाठी मात्र फायद्याचा ठरला असता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
KKR vs PBKS : पावसामुळे केकेआर वाचली पण Ajinkya Rahane ची एक चूक कुणाच्याच लक्षात आली नाही!