कशी घडली घटना?
संग्राम गाडे याचा ५ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघात झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व प्रयत्न करून शेवटी डॉक्टरांनी संग्रामला 'ब्रेन डेड' घोषित केले. गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण अशा परिस्थितीतही त्यांनी डगमगून न जाता एक धाडसी निर्णय घेतला.
advertisement
पित्याचे हृदयस्पर्शी शब्द
जेव्हा डॉक्टरांनी पालकांकडे अवयवदानाविषयी विचारणा केली, तेव्हा वडील रमेश गाडे यांनी अश्रू पुसत दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांच्या अंगावरही काटा आला. ते म्हणाले, "माझ्या मुलाचे फक्त डोळेच नाही, तर त्याचे पूर्ण शरीरच दान करा. जे शरीर मातीत मिसळून जाणार आहे, ते जर कोणाला तरी नवी दृष्टी किंवा जीवन देऊ शकत असेल, तर त्यापेक्षा मोठं पुण्य काय?"
गाडे कुटुंबाच्या या निर्णयामुळे पाच रुग्णांच्या जगण्याची आशा पल्लवित झाली आहे. ग्रामीण भागातील ही घटना अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करणारी आहे. "माझा मुलगा अवयवांच्या रूपात आता पाच जणांमध्ये जिवंत राहील," ही भावना व्यक्त करणारे हे कुटुंब खऱ्या अर्थाने माणुसकीचा नवा आदर्श ठरले आहे. या थोर निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
