TRENDING:

उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? पुण्यातून 450 जादा बस, कोल्हापूर, कोकण अन् कुठं जाणार?

Last Updated:

ST Bus: पुण्यातील विविध आगारातून राज्यातील विविध ठिकाणांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की पुण्यातून गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रेल्वे, एसटी बस आणि सर्वच प्रवासी वाहनांना गर्दी वाढते. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातून कोल्हापूरसह कोकण, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासी जातात. त्यांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी जादा बस चालवण्यात येणार आहेत. 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत 450 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
ST Bus: उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? पुण्यातून 450 जादा बस, कुठून कुठं जाणार?
ST Bus: उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? पुण्यातून 450 जादा बस, कुठून कुठं जाणार?
advertisement

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लाखो लोक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक आहेत. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच अनेकजण गावी जातात. तर काहीजण पर्यटनाचे नियोजन देखील करत असतात. त्यासाठी महिन्याभरापासूनच रेल्वे, एसटीसह इतर वाहनांचे सीट आरक्षित केले जातात. परंतु, काही वेळा बुकिंग फुल्ल झाल्याने अडचण होते. त्यासाठी एसटीने मोठा निर्णय घेतला आहे.

advertisement

प्रवाशांनो टेन्शन सोडा, रेल वन ॲपवरील अडकलेले पैसे आता परत मिळणार; फक्त 'हे' करा

कुठून कुठे जाणार जादा बस?

पुण्यातील विविध आगारातून राज्यातील विविध ठिकाणांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट आगारातून ठाणे, बोरिवली, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर या ठिकाणी बस सोडण्यात येतील.

पुणे स्टेशन आगारातून दादरसाठी बस धावतात. या काळात जादा बस सोडण्यात येईल.

advertisement

शिवाजीनगर आगारातून छत्रपती संभाजीनगरसह नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरिवली या मार्गावर नियमित बस धावतात. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात जादा बस सोडण्यात येतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

दरम्यान, दरवर्षी शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर अनेकजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. 10 ते 12 एप्रिलपर्यंत या परीक्षा संपतात. यंदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाले असून 25 एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहतील. त्यामुळे त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? पुण्यातून 450 जादा बस, कोल्हापूर, कोकण अन् कुठं जाणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल