ज्येष्ठ नागरिक आणि आयटीयन्सचे हाल
वीज नसल्यामुळे इमारतीमधील लिफ्टही बंद पडल्या. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना वरच्या मजल्यांवर ये-जा करणे अशक्य झाले. 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे काम ठप्प झाल्याने त्यांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. यासोबतच उन्हाळ्याचे दिवस असल्याने २४ तास आणि रात्रभर विजेविना राहिल्याने घरातील दूध, अन्नपदार्थ आणि भाज्या खराब झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. मेट्रो स्टेशनच्या कामासाठी सुरू असलेल्या बेजबाबदार खोदकामामुळे मुख्य वीज वाहिन्या म्हणजेच केबल्स तुटल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
advertisement
४० हजारांचा आर्थिक भुर्दंड
सोसायटीचा बॅटरी बॅकअप संपल्यानंतर, लिफ्ट आणि कॉमन एरियातील दिवे सुरू ठेवण्यासाठी जनरेटरचा आधार घ्यावा लागला. यासाठी तब्बल ४०० लिटर डिझेल जळाले, ज्याचा खर्च अंदाजे ४० हजार रुपयांच्या घरात गेला असल्याचं सांगितलं जात आहे. "मेट्रोच्या चुकीमुळे आम्हाला हा आर्थिक भुर्दंड का सोसावा लागतोय?" असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
मेट्रो आणि महावितरणविरोधात संताप
मंगळवारी सकाळी यशवीन सोसायटीच्या रहिवाशांनी प्रवेशद्वारावर एकत्र येत मेट्रो प्रशासन आणि महावितरण विरोधात जोरदार निदर्शने केली. मेट्रोच्या कामामुळे वारंवार वीज वाहिन्या तुटत असूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
"मेट्रो स्टेशनसाठी सुरू असलेल्या खोदकामात केबल्स तुटल्या होत्या. खूप खोलवर काँक्रीट आणि दगड खाली या केबल्स अडकल्याने दुरुस्तीला वेळ लागला. मेट्रोच्या कामाचा यापूर्वीही अनेकदा फटका बसला आहे." — एन. बी. येनगे, सहायक अभियंता, महावितरण, हिंजवडी विभाग.
