सोमवती अमावस्येला 'या' चुका टाळाच
तुळशीचे पान तोडणे किंवा पाणी घालणे
अनेक लोक भक्तिभावाने अमावस्येला तुळशीची पूजा करतात. मात्र, सोमवती अमावस्येला तुळशीचे पान तोडणे सक्त मनाई आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास तुळशीमध्ये असतो. तसेच, विनाकारण तुळशीला स्पर्श करणे किंवा जास्त पाणी घालणे या दिवशी अशुभ मानले जाते. यामुळे घरातील समृद्धी कमी होऊ शकते.
advertisement
तामसिक भोजन आणि मद्यपान
अमावस्या ही चंद्राची क्षीण स्थिती असते, ज्याचा थेट परिणाम मानवी मनावर होतो. या दिवशी कांदा, लसूण, मांस किंवा मद्यपान केल्याने मनातील नकारात्मकता वाढते. तामसिक अन्नामुळे पितृदोष बळावतो, ज्यामुळे कुटुंबात विनाकारण वाद आणि पैशांची चणचण निर्माण होते.
उशिरापर्यंत झोपणे किंवा वाद करणे
सोमवती अमावस्येला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती या दिवशी उशिरापर्यंत झोपतो, त्याच्या कुंडलीतील चंद्र आणि शनी खराब होतात. तसेच, या दिवशी कोणाशीही भांडण, वाद किंवा कोणाचा अपमान करू नका. विशेषतः घरातील स्त्री किंवा वडिलांचा अपमान केल्यास पितर संतप्त होतात.
पिंपळाचे झाड तोडणे किंवा स्पर्श करणे
सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी चुकूनही पिंपळाची फांदी तोडू नका किंवा झाडाला हानी पोहोचवू नका. शनिवार सोडून इतर दिवशी सूर्यास्तापूर्वी पिंपळाला स्पर्श करणे टाळावे; केवळ प्रदक्षिणा घालून पूजा करावी.
रात्रीच्या वेळी 'या' ठिकाणी जाऊ नका
सोमवती अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानभूमी, निर्जन रस्ते किंवा नदीकाठी एकटे जाणे टाळावे. लहान मुले आणि गरोदर स्त्रियांनी या दिवशी बाहेर पडताना काळजी घ्यावी.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
