अयोध्या : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता तिसऱ्यांदा भाजपचे सरकार तयार होणार आहे. या निवडणुकीत भाजपने 400 पार हा नारा दिला होता. मात्र, भाजपला बहुमताचा आकडाही पार करता आलेला नाही. मात्र, यासोबतच यावेळी एनडीएला पूर्ण बहूमत मिळाले आहे.
तसेच लवकरच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. अशावेळी वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ हा कसा राहील, 5 वर्षात काय काय बदल होतील इतकेच नव्हे तर भाजपला 400 पेक्षा जास्त जागा कधी मिळतील, याबाबतही ज्योतिषांनी महत्त्वाची भाष्य केले आहे.
advertisement
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, एकदा पुन्हा देशात मोदी सरकार स्थापन होणार आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पुढच्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक मोठी विकासकामे करणार आहेत. भाजपचा "अब की बार 400 पार" हा जो नारा होता, ते स्वप्नही आगामी काळात पूर्ण होणार आहे.
यामुळे होतो इन्व्हर्टरच्या बॅटरीचा स्फोट, overheat पासून नेमका कसा बचाव कराल, महत्त्वाचा सल्ला
यासोबतच जागतिक स्तरावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठ्या प्रमाणात निर्णय घेणार आहेत. पुढच्या 5 वर्षात संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. 2027 मध्ये देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश होणार आहे. देशात अनेक प्रकारचे बदल झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळतील.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.