गौरीच्या आगमनानंतर कोकणातील महिला एकत्र येऊन झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे वेगवेगळे खेळ खेळले जातात. गौराईसह रात्र जागवली जाते. सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. तिला खूश करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात.
गणरायाची आरती म्हणताना तुम्हीही 'या' चुका करता का? 99 टक्के लोकांना हे माहित नाही
advertisement
महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये गौरीला गोडाचा नैवेद्य दाखवला जात असला तरीही कोकणात मात्र तिला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या नैवेद्यामध्ये गौराईसाठी वडे मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा समावेश असतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी गौरीसाठी दारू देखील ठेवली जाते. असे करण्यामागे काय कारण असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का. आज आपण करण्यामागचे कारण जाणून घेऊया.
गौरीला तिखटाचा नैवेद्य दाखवण्यामागची अख्यायिका
पौराणिक कथांनुसार, गौराईचे भगवान शंकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा त्यांनी तिच्या रक्षणासाठी आपले भूतगण तिच्यासोबत पाठवले. गौराईला माहेरी आलेले पाहून तिच्या घरच्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी तिचे कोडकौतुक केले. तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला. मात्र यावेळी गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. ही गोष्ट गौराईच्या लक्षात आली.
शंकराचे भूतगणांना स्मशानात रहायची सवय असल्याने ते मांसाहार करत असत. त्यांची अडचण गौरी समजली आणि तिने भूतगणांसाठी मांसाची व्यवस्था करायला लावली आणि त्यांना मांसाहार मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले. या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येते तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते. ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य गौरीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.
