TRENDING:

Mahabharat : महाभारताचं युद्ध फक्त 18 दिवसांतच का संपलं? काय आहेत यामागील कारणं?

Last Updated:

Mahabharat story : कुरुक्षेत्राच्या भूमीवर लढलेलं महाभारत युद्ध केवळ कौटुंबिक कलह नव्हतं तर धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य यांच्यातील युद्ध होतं. अनेकदा प्रश्न पडतो की इतकं भयंकर युद्ध फक्त 18 दिवसांत कसं संपलं?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आता जर तुम्ही युद्ध पाहिली तर ती कित्येक महिने चालतात. इतिहासातील युद्धांचा विचार केला तर महाभारत एकसुद्धा एक मोठं युद्ध होतं.  कुरुक्षेत्राच्या भूमीवर लढलेलं महाभारत युद्ध केवळ कौटुंबिक कलह नव्हतं तर धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य यांच्यातील युद्ध होतं. इतकं भयंकर युद्ध फक्त 18 दिवसांत संपलं.
News18
News18
advertisement

महाभारत हा भारतीय इतिहासाचा एक अध्याय आहे जो स्वतःमध्ये अनेक रहस्ये दडवून ठेवतो. महाभारतासारखं मोठं युद्ध 18 दिवसांतच कसं संपलं? यामागे अनेक कारणे दिली आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

भीष्म पितामह यांना मिळाले वरदान : भीष्म पितामह यांना इच्छामृत्यूचं वरदान मिळालं होतं. त्यांनी पांडवांना त्यांच्या मृत्युचं रहस्य सांगितलं होतं, त्यानुसार जर शिखंडी त्यांच्यासमोर असेल तर ते शस्त्र उचलणार नाहीत. अर्जुनने ही युक्ती वापरली आणि भीष्मांवर बाण सोडले. त्यानंतर ते बाणांच्या शय्येवर पडले आणि युद्धाच्या दहाव्या दिवशी त्यांनी आपले प्राण सोडले. भीष्मांच्या पतनामुळे कौरव सैन्याचं मनोबल खचलं.

advertisement

युद्धाचे नियम : महाभारताच्या युद्धाचे काही नियम होते जे दोन्ही बाजूंना पाळावे लागत होते. सूर्यास्तानंतर युद्ध थांबवण्यात येत असे आणि सैन्य रात्री विश्रांती घेत असत. यामुळे युद्धाचा कालावधी मर्यादित झाला.

Mahabharat : महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रच का निवडलं? या जागेत खास काय?

दोन्ही बाजूंचे शक्तिशाली सैन्य : कौरव आणि पांडव दोघांकडेही महारथी, योद्धे आणि शस्त्रे असलेले शक्तिशाली सैन्य होते. दोन्ही बाजूंमध्ये भयंकर युद्ध झाले ज्यामुळे अल्पावधीतच मोठे नुकसान झाले आणि युद्ध लवकर संपले.

advertisement

कृष्णाची रणनीती : भगवान श्रीकृष्णाने पांडवांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कूटनीतीद्वारे त्यांना विजयाकडे नेलं. त्यांच्या रणनीतींमुळे युद्धाचे स्वरूप बदललं आणि कौरवांचा पराभव झाला.

काळाचं चक्र : काही विद्वानांचा असा विश्वास आहे की महाभारत युद्ध एका विशिष्ट वेळेसाठी होणार होतं. ती एक दैवी योजना होती ज्याचं उद्दिष्ट धर्माची स्थापना करणं होतं.

advertisement

Mahabharat : मृत झाला होता राजा, राणीने ठेवले संबंध, 7 मुलांचा जन्म; विज्ञानही म्हणतं शक्य आहे

या सर्व कारणांच्या संयोजनामुळे महाभारताचे युद्ध केवळ 18 दिवसांत संपले. हे युद्ध आजही आपल्याला धर्म, न्याय आणि कर्तव्याचे धडे देतं.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : महाभारताचं युद्ध फक्त 18 दिवसांतच का संपलं? काय आहेत यामागील कारणं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल