advertisement

Mahabharat : महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रच का निवडलं? या जागेत खास काय?

Last Updated:

Mahabharata Story : असं म्हटलं जातं की जेव्हा युद्ध निश्चित होतं तेव्हा श्रीकृष्णाने देशभर आपले दूत पाठवले होते. त्यांना या महायुद्धासाठी सर्वात योग्य अशी जमीन शोधावी लागली.

News18
News18
नवी दिल्ली : महाभारताचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात विनाशकारी युद्धांपैकी एक होतं. या युद्धाचे ठिकाण असलेले कुरुक्षेत्र नेहमीच रहस्य आणि कुतूहलाचा विषय राहिला आहे. भगवान श्रीकृष्णाने या महायुद्धासाठी संपूर्ण भारतातील कुरुक्षेत्राची भूमी का निवडली, तिथं असं काय आहे? असा प्रश्नही आहे. महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्र निवडण्यामागे अनेक कथा आहेत.
असं म्हटलं जातं की जेव्हा युद्ध निश्चित होतं तेव्हा श्रीकृष्णाने देशभर आपले दूत पाठवले होते. त्यांना या महायुद्धासाठी सर्वात योग्य अशी जमीन शोधावी लागली. भावंडांमध्ये, गुरु-शिष्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये युद्ध पाहून लोक भावनिक होतील आणि युद्ध थांबवतील अशी भीती श्रीकृष्णाला होती, म्हणून त्यांना अशा जागेची आवश्यकता होती जिथं राग आणि द्वेषाच्या भावना इतक्या खोलवर रुजल्या असतील की युद्धादरम्यान या भावना वर्चस्व गाजवतील.
advertisement
जेव्हा दूतांनी कुरुक्षेत्राबद्दल सांगितलं तेव्हा श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. त्यांना सांगण्यात आलं की कुरुक्षेत्रात एका भावाने त्याच्या धाकट्या भावाची हत्या केली कारण त्याने शेताची सीमा भिंत तोडण्यास नकार दिला होता. रागाच्या भरात मोठ्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार केले आणि त्याचा मृतदेह ओढत तुटलेल्या बांधावर फेकून दिला.
advertisement
ही घटना ऐकून श्रीकृष्णाला समजलं की कुरुक्षेत्र हेच ते ठिकाण आहे जिथं महाभारताचे युद्ध लढलं पाहिजे. या भूमीवर इतकं रक्त सांडलं गेलं होतं की ती युद्धासाठी पूर्णपणे योग्य होती. येथील मातीत राग आणि द्वेषाच्या भावना इतक्या खोलवर रुजल्या होत्या की जर इथं युद्ध झालं तर दया किंवा करुणेची भावना निर्माण होणार नाही.
advertisement
कुरुक्षेत्र निवडण्यामागे आणखी एक कारण दिलं जातं. असं म्हटलं जातं की भगवान इंद्र एकदा कुरुक्षेत्रात आले होते. त्यांनी कुरुंना विचारलं होतं की ते ही जमीन का नांगरत आहेत? कुरुंनी म्हटलं होतं की या भूमीवर जो कोणी मारला जाईल तो स्वर्गात जाईल. भगवान इंद्र यांनी यावर सहमती दर्शवली होती, म्हणून भीष्म, कृष्ण आणि इतर योद्ध्यांना माहित होते की या भूमीवर जो कोणी मारला जाईल तो स्वर्गात जाईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mahabharat : महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रच का निवडलं? या जागेत खास काय?
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement