Mahabharat : महाभारत काळात कुंतीला मिळालेला शाप, आजही कायम, भोगत आहेत सगळ्या महिला

Last Updated:

Mahabharat Story : महाभारतात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने तिला शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर आहे, असं मानलं जातं.

News18
News18
नवी दिल्ली : महाभारत काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या आजही संस्मरणीय आहेत. महाभारत युद्ध कौरव आणि पांडव यांच्यात झाले. पण तुम्हाला माहित आहे का महाभारत काळात दिलेला एक शाप आजही सर्व महिला भोगत आहेत. युद्धिष्ठरने आपली माता कुंतीला दिलेला हा शाप. हा शाप कोणता आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
महाभारतात एक घटना आहे ज्यात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर असल्याचं मानलं जातं.
काय आहे तो शाप?
कथेनुसार महाभारत युद्ध संपलं तेव्हा माता कुंती कर्णाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रडत होती. हे दृश्य पाहून पांडव आश्चर्यचकित झाले.  शत्रूच्या मृत्यूवर माता कुंती का रडत आहे, हे पांडवांनी तिला विचारलं. तेव्हा कर्ण आपला मोठा मुलगा असल्याचं तिनं आपल्या मुलांना सांगितलं.
advertisement
हे ऐकून युधिष्ठिरला राग आला आणि त्यानं माता कुंतीला शाप दिला. आजपासून संपूर्ण स्त्री जाती आपल्या पोटात काहीही लपवू शकणार नाही, असं तो म्हणाला. तेव्हापासून हा शाप आजही महिलांना लागू आहे, असं म्हटलं जातं. महिलांच्या पोटात काही राहत नाही, असं म्हणतात.
advertisement
कसा झाला होतो कर्णाचा जन्म?
महाभारत ग्रंथात सांगिल्यानुसार, एकदा दुर्वासा ऋषी कुंतीच्या सेवेने खूप आनंदित झाले. त्यांनी खुश होऊन कुंतीला एक मंत्र दिला. या मंत्राचा जप करून ती ज्या देवाची आराधना करेल, त्या देवाचा पुत्र तिला प्राप्त होईल, असं हे वरदान होतं. या मंत्राचं परीक्षण करण्याचा विचार कुंतीच्या मनात आला. तिने सूर्यदेवाचं आवाहन केलं. सूर्यदेवाकडून तिला कवचकुंडल असलेल्या पुत्राची प्राप्ती झाली.
advertisement
पण लग्नाशिवाय जन्माला आलेलं हे मूल, लोक काय म्हणतील या भीतीनं कुंतीने मुलाला एका पेटीत ठेवून गंगा नदीत सोडलं. त्यानंतर तो हस्तिनापुरातील सारथी म्हणजे सुताला अधिरथला मिळाला. म्हणून त्याला सुतपुत्र म्हणतात. याशिवाय त्याचा सांभाळ करणारी आई राधाच्या नावावरून त्याला राधेय असंही म्हटलं जातं. दानाच्या या स्वभावामुळे त्याला दानवीर कर्ण असंही म्हणतात. जेव्हा कर्णाने देवराज इंद्रला स्वत:ची कवच-कुंडलं दान केली तेव्हा त्याला वैकर्तन असं नाव पडलं. वैकर्तन नावाचा अर्थ सूर्याच्या वंशात जन्म झालेली व्यक्ती असा होतो. अंगदेशचा राजा म्हणून त्याला अंगराज असंही म्हणतात.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : महाभारत काळात कुंतीला मिळालेला शाप, आजही कायम, भोगत आहेत सगळ्या महिला
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement