विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी उपाय
ज्योतिषांच्या मते, जर लग्नाला उशीर होत असेल किंवा वैवाहिक तणाव असेल तर महाशिवरात्रीला शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा करा. देवी पार्वतीला सिंदूर, बांगड्या आणि बिंदी अर्पण करा आणि भगवान शिव यांना पंचामृताने अभिषेक करा. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी, शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात स्थिरता येते.
advertisement
लवकर विवाहासाठी महाशिवरात्रीचे महाउपाय
केशरयुक्त दुधाचा अभिषेक
जर लग्नाला विलंब होत असेल, तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. दुधामुळे चंद्र आणि शुक्र ग्रह बलवान होतात, जे लग्नासाठी कारणीभूत मानले जातात. अभिषेक करताना 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा.
बेलपत्रावर चंदन लावून अर्पण करा
108 बेलपत्रे घ्या आणि त्यावर चंदनाने 'राम' किंवा 'ॐ नमः शिवाय' लिहा. ही बेलपत्रे 'ॐ नमः शिवाय' म्हणत शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय मनासारखा जोडीदार मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
'हे' विशेष मंत्र जप
अविवाहित मुलींनी 'हे गौरि शंकरार्धांगि यथा त्वं शंकरप्रिया। तथा मां कुरु कल्याणि कान्तकातां सुदुर्लभाम्॥' या मंत्राचा जप करावा. तर मुलांनी महादेवाच्या मंदिरात बसून 'ॐ नमः शिवाय' या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा.
पिवळ्या वस्तूंचे दान
विवाहाचा कारक ग्रह 'गुरू' मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा आणि गरजू व्यक्तीला पिवळे धान्य, पिवळी फुले किंवा चणा डाळ दान करा. यामुळे गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होते.
रुद्राक्षाचे पूजन
लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी 'गौरी-शंकर' रुद्राक्षाचे पूजन करून तो धारण करावा. असे मानले जाते की, या रुद्राक्षामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि अविवाहितांना योग्य स्थळ लवकर मिळते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
