मार्चला रंग का खेळू नयेत?
यंदा 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. या ग्रहणामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही नियम पाळणे आवश्यक आहे. चंद्रग्रहणाचे सूतक ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होते. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता ग्रहण स्पर्श होणार असला, तरी सकाळी 6:20 वाजल्यापासूनच सूतक काळ सुरू होईल. सूतक काळात कोणतेही शुभ कार्य, उत्सव किंवा आनंदोत्सव साजरा करणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे.
advertisement
नकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य
प्रेमानंद महाराजांच्या मते, ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. रंगांच्या उत्सवात आपण बाहेर पडतो, एकमेकांना स्पर्श करतो आणि आरडाओरडा करतो. ग्रहण काळात आपली रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थिती संवेदनशील असते. अशा वेळी रंग खेळल्याने किंवा बाहेर पडल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
भक्ती आणि साधनेचा काळ
महाराजांनी सांगितले आहे की, ग्रहण काळ हा देवाच्या नामस्मरणाचा काळ आहे. रंगांच्या धुंदीत राहण्यापेक्षा हा वेळ 'मंत्र जप' किंवा 'प्रार्थनेत' घालवल्याने ग्रहणाचे अशुभ परिणाम नष्ट होतात. "ग्रहणाच्या वेळी इंद्रिय सुखात रमणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे होय," असे ते म्हणतात.
नेमकी रंगांची होळी कधी खेळायची?
शास्त्रीय दृष्टिकोनातून 3 मार्चला ग्रहणामुळे 'धुळवड' साजरी करणे योग्य नाही. म्हणूनच, यंदा अनेक ठिकाणी 4 मार्च 2026 रोजी रंगांचा सण साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 मार्चच्या रात्री ग्रहण मोक्ष झाल्यानंतर शुद्धीकरण करून 4 मार्चच्या सूर्योदयाला आनंदाने रंग खेळणे सर्वार्थाने शुभ ठरेल. 3 मार्चला ग्रहण काळात रंग खेळणे टाळून आपली संस्कृती आणि आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
