TRENDING:

महाशिवरात्रीला घ्यायचाय भस्म आरतीचा लाभ, तर पाळावे लागणार 'हे' कडक नियम; जाण्यापूर्वी नक्कीच वाचा

Last Updated:

उज्जैनचे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत जागृत आणि दक्षिणमुखी स्थान आहे. येथील 'भस्म आरती' ही केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ujjain Bhasm Aarti Rules : उज्जैनचे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत जागृत आणि दक्षिणमुखी स्थान आहे. येथील 'भस्म आरती' ही केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. जर तुम्ही या महाशिवरात्रीला बाबा महाकालच्या भस्म आरतीला उपस्थित राहण्याचा विचार करत असाल, तर काही कडक नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

जगप्रसिद्ध भस्म आरती: एक दैवी अनुभव

महाकालेश्वर मंदिरात दररोज पहाटे 4:00 ते 6:00 या वेळेत भस्म आरती केली जाते. ही आरती पाहण्यासाठी भाविक रात्री 1:00 वाजेपासूनच रांगेत उभे राहतात. 'महाकाल' म्हणजे काळाचाही काळ. मृत्यूनंतर सर्व काही राखेत विलीन होते, हे सत्य दर्शवण्यासाठी महादेवाला ताज्या भस्माने स्नान घातले जाते. हे भस्म पूर्वी स्मशानातील चितेचे असायचे, परंतु आता ते विशेषतः गायीच्या शेणापासून तयार केले जाते.

advertisement

भस्म आरतीसाठीचे कडक नियम आणि ड्रेस कोड

भस्म आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम पाळणे बंधनकारक आहे. गर्भगृहात किंवा नंदी हॉलमध्ये बसण्यासाठी पुरुषांना केवळ धोती आणि सोळा नेसणे अनिवार्य आहे. शर्ट, टी-शर्ट किंवा पँट घालून प्रवेश मिळत नाही. महिलांसाठी साडी नेसणे अनिवार्य आहे. काही टप्प्यांवर पदर घेण्याचा नियम पाळावा लागतो. मोबाईल फोन, कॅमेरे, पाकीट आणि चामड्याच्या वस्तू मंदिरात नेण्यास सक्त मनाई आहे. भस्म आरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन ऍडव्हान्स बुकिंग करणे आवश्यक आहे. महाशिवरात्रीला भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने हे बुकिंग अनेक दिवस आधी पूर्ण होते.

advertisement

महिलांना आरती पाहण्यास विशिष्ट कालावधीत मनाई का?

भस्म आरतीच्या एका विशिष्ट क्षणी पुजाऱ्यांकडून घोषणा केली जाते की "माता-भगिनींनी आपला चेहरा झाकून घ्यावा." यामागे काही कारणे आहेत. भस्म अर्पण करण्यापूर्वी महादेवाचे स्नान आणि शृंगार होतो. यावेळी भगवान शिव आपल्या दिगंबर रूपात असतात. भारतीय परंपरेत आणि संहितेनुसार, स्त्रियांनी पुरुषाचे असे रूप पाहणे अयोग्य मानले जाते. स्मशानातील राख ही वैराग्याचे प्रतीक आहे. या विधीच्या वेळी वातावरणात अत्यंत तीव्र ऊर्जा असते, जी स्त्रियांच्या संवेदनशील शरीरयष्टीसाठी हानिकारक ठरू शकते, अशी धार्मिक धारणा आहे.

advertisement

शिव-वरात आणि भस्म आरतीची पौराणिक कथा

मसान होळी आणि भस्म आरतीचा संबंध भगवान शिवाच्या विवाहाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी वरात घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे स्वरूप अत्यंत अघोरी होते अंगाला राख फासलेली, गळ्यात सापांच्या माळा आणि सोबत भूत-प्रेत. हे पाहून उपस्थित महिला आणि पार्वतीची माता 'मैना' भयभीत झाल्या. तेव्हापासून महादेवाचे हे औघड आणि भस्म-आरती स्वरूप सर्वांनी पाहणे टाळावे आणि केवळ शुद्ध स्वरूपाचे दर्शन घ्यावे, अशी प्रथा रूढ झाली. दुसऱ्या एका कथेनुसार, दूषण नावाच्या राक्षसाचा वध केल्यावर शिवाने त्याच्याच राखेने स्वतःचा शृंगार केला होता, तेव्हापासून उज्जैनमध्ये भस्म आरतीची परंपरा सुरू झाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
महाशिवरात्रीला घ्यायचाय भस्म आरतीचा लाभ, तर पाळावे लागणार 'हे' कडक नियम; जाण्यापूर्वी नक्कीच वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल