TRENDING:

देवीच्या अंघोळीच्या पाण्याने बरे होतात आजार; काय आहे शीतला देवी मंदिराची आख्यायिका?

Last Updated:

या मंदिरात देवीच्या अंघोळीच्या पाण्याने आजार बरे होतात असे सांगितले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण, 7 ऑक्टोबर : हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा सण म्हणजे नवरात्र. नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव समजला जातो. नवरात्री उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. देशात देवीची अनेक मंदिरे आहेत. यापैकीच शीतला देवीचे मंदीर कल्याणमध्ये आहे. या मंदिरात देवीच्या अंघोळीच्या पाण्याने आजार बरे होतात असे सांगितले जाते. त्यामुळे भाविक या ठिकाणी दूरवरून दर्शनासाठी येतात.
advertisement

काय आहे आख्यायिका?

कल्याण स्थानक हे एक गजबजलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी शीतला देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात देवीची उपासना केली जाते. ही देवी स्वयंभू असून या मंदिरात कांजण्या, गोवर, खरूज यासारखे त्वचा रोग झाले असतील तर देवीचे अंघोळीचे पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकावे लागते त्यानंतर ते सर्व रोग बरे होतात अशी एक आख्यायिका आहे, अशी माहिती मंदिराच्या पूजारी काजल गुरव यांनी दिली.

advertisement

हनुमान आणि दुर्गामाता एकत्र, कसं आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर?

या देवीला दुपारी 12 वाजल्यानंतर घातली जाते अंघोळ

सर्वच देवळात देवांना सकाळी आंघोळ घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर पूजा अर्चा होते. मात्र या देवीला दुपारी 12 वाजल्यानंतर अंघोळ घातली जाते. तोपर्यंत भाविक येऊन देवीला पाणी अर्पण करतात. त्यानंतर दुपारी 12 नंतर देवीला अंघोळ घातली जाते. मुखवटे लावले जातात अशी माहिती मंदिराचे गुरव काळे यांनी दिली.

advertisement

कांजण्या आणि गोवर बरा होतो अशी ख्याती

गोवर, कांजण्या, खरूज झालेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या औषधाबरोबरच शीतलादेवीच्या मंत्रोपचाराने पाणी दिले जाते. हे पाणी अंघोळीच्या वेळी पाण्यात टाकले तर आराम पडतो अशी ख्याती आहे. त्यामुळे अनेक जण कांजण्या, गोवर झाला तर रुग्णांना या मंदिरात घेऊन येतात, पूजारी काजल गुरव यांनी सांगितले.

विदर्भातील या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास, योगी आदित्यनाथांशी आहे खास कनेक्शन

advertisement

शीळ सप्तमीला होतो कार्यक्रम

शीळ सप्तमीला या देवळात भाविक मोठी गर्दी करतात. या देवळात आदल्या दिवशी शिजवलेले अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करतात अशी प्रथा आहे.

नवरात्रात नवमीला होतो यज्ञ

नवरात्रात नऊ दिवस घट बसवले जातात. नऊ दिवस मंदिरात प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. नऊव्या दिवशी नाव चंडीचा होम केला जातो.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
देवीच्या अंघोळीच्या पाण्याने बरे होतात आजार; काय आहे शीतला देवी मंदिराची आख्यायिका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल