TRENDING:

Vijaya Ekadashi 2026: विरोधकांचा टांगा पलटी..! विजया एकादशी दिवशी केलेल्या या गोष्टी शत्रुंवर विजय मिळवून देतात

Last Updated:

Vijaya Ekadashi 2026: प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता. अशी मान्यता आहे की, हा उपवास केल्याने भक्ताचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूंचा पराभव होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी पंचागानुसार प्रत्येक वर्षी माघ कृष्ण एकादशीला विजया एकादशीचा उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी भक्त मनोभावे विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्या मंत्रांचा जप करतात. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. विजया एकादशीचा उपवास केल्याने शत्रूंवर विजय मिळतो, कुटुंबाची प्रगती होत राहते आणि कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
News18
News18
advertisement

श्रीरामांनी केला होता विजया एकादशीचा उपवास - प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता. अशी मान्यता आहे की, हा उपवास केल्याने भक्ताचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूंचा पराभव होतो. विजया एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.

advertisement

शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी भगवान विष्णूंचे मंत्र

श्री हरी विष्णूच्या या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते:

ॐ नमोः नारायणाय॥

ॐ नमोः भगवते वासुदेवाय॥

ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥

तसेच, मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुडध्वजः। मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥ या मंत्राचाही जप करावा.

विजया एकादशीला काय दान करावे -

advertisement

विजया एकादशीला गरीब किंवा गरजू लोकांना पिवळे कपडे दान करणे खूप शुभ असते. यामुळे संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील समस्या कमी होतात.

विष्णूची कृपा मिळवण्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी या दिवशी तांदळाचे दान करावे. यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळण्यास मदत होते.

महाशिवरात्रीला 300 वर्षांनी दुर्मीळ संयोग; भाग्यशाली 3 राशींवर अनपेक्षित धनवर्षा

advertisement

जो भक्त विजया एकादशीला गाईच्या तुपाचे दान करतो, त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच कुंडलीतील शुक्र आणि गुरू ग्रहांची स्थिती मजबूत होते.

या दिवशी श्रीमद्भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम यांसारख्या धार्मिक पुस्तकांचे दान केल्यास आयुष्यातील कठीण प्रसंग दूर होऊ शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी विजया एकादशीला तीळ आणि गुळाचे दान करावे. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Vijaya Ekadashi 2026: विरोधकांचा टांगा पलटी..! विजया एकादशी दिवशी केलेल्या या गोष्टी शत्रुंवर विजय मिळवून देतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल