वास्तुशास्त्र, लाल किताब आणि धार्मिक ग्रंथांनुसार, सकाळी झाडू मारणे हे केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही, तर धार्मिक ऊर्जा आणि लक्ष्मी प्राप्तीचे माध्यम देखील मानले जाते. त्यामुळे दररोज सकाळी झाडू मारताना काही गोष्टी बोलणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया, सकाळी झाडू मारताना कोणत्या गोष्टी मनात बोलायला हव्यात...
advertisement
मनातल्या मनात 'हे' सतत म्हणत रहा
ज्योतिष शास्त्रानुसार, सकाळी फरशी साफ करताना मनातल्या मनात हे म्हणत राहा की, "आमच्या घरातून आजारांचं साम्राज्य बाहेर जात आहे. कचऱ्यासोबत दारिद्र्यही दूर होत आहे. आमच्या घरातील सर्व सदस्यांचा ताणतणाव दूर होत आहे आणि सर्व दुःख आणि अडचणीही संपत आहेत."
घरातल्या सदस्यानेच झाडू मारले पाहिजे
जर तुम्ही दररोज झाडू मारताना या गोष्टी बोललात, तर काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसू लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या गोष्टी फक्त घरातील सदस्यांनीच बोलायच्या आहेत. नंतर तुम्ही मोलकरणीकडून साफसफाई करून घेतली तरी चालेल, पण सकाळी झाडू मारणे आणि या गोष्टी बोलणे हे घरातील सदस्यानेच केले पाहिजे.
ही एक प्रार्थनेच्या स्वरूपातील मंत्र आहे
जेव्हा तुम्ही झाडू मारत असाल, तेव्हा हे लक्षात ठेवा की तुम्ही दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर करत आहात. तसेच, मनातल्या मनात म्हणत राहा, "हे माता लक्ष्मी, मला आशीर्वाद देत राहा..." याचबरोबर, "सर्व दोष दूर होवोत, दारिद्र्य नाहीसे होवो आणि घरात सुख-समृद्धी नांदो." ही एक प्रार्थनेच्या स्वरूपातील मंत्र आहे. सकाळी झाडू मारताना हे मनापासून म्हणा; असे केल्याने मनोबल वाढते आणि मन शांत राहते. तसेच, घरात माता लक्ष्मीचा वास होतो.
सकाळी झाडू मारताना 'आई लक्ष्मी घरात ये, आमच्या घरातलं दारिद्र्य बाहेर जावू दे'. असे सकारात्मक शब्द मनातल्या मनात म्हणा आणि नंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहील आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकून राहील. यासोबतच, सकाळी 'सर्व भांडणे आणि दु:खे दूर होवोत, घरात प्रेम आणि आनंदाची भरभराट होवो' असे सकारात्मक शब्द मनातल्या मनात बोलल्यास प्रत्येक दुःख दूर होईल.
हे ही वाचा : Healthy Living : जेवल्यानंतर लगेचच का येते झोप? शरीराचा आणि अन्नाचा काय संबंध, समजून घ्या
हे ही वाचा : कुंडलीतील 'या' ग्रहांमुळे माणूस बनतो लबाड अन् बोलघेवडा; थापा मारण्यात 'ही' माणसं असतात पटाईत!