कॅमेरा कॉइनवरून हटवण्यात आला?
टॉसच्या या प्रकारानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त करत याला 'टॉस फिक्सिंग' असं नाव दिलं आहे. काही चाहत्यांनी जाणीवपूर्वक कॅमेरा कॉइनवरून हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅचेसमध्येच अशा तांत्रिक चुका किंवा संशयास्पद गोष्टी वारंवार कशा घडतात, असा प्रश्न विचारत चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
advertisement
अजिंक्य रहाणे काहीसा गोंधळला
हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या पिचबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त केले. रहाणे म्हणाला की, त्याने वानखेडेच्या पिचवर यापूर्वी कधीही इतके गवत पाहिले नव्हते. प्रॅक्टिससाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी आणि प्रत्यक्ष मॅचची खेळपट्टी यामध्ये मोठी तफावत असल्याचे पाहून रहाणे काहीसा गोंधळलेला दिसलेला दिसला.
पहिली बॉलिंगच केली असती
दरम्यान, आम्ही टॉस जिंकला असता तरी पहिली बॉलिंगच केली असती, असं अजिंक्य रहाणे यावेळी म्हणाला. मात्र, टॉस गमावल्यानंतरही केकेआरने बॅटिंगमध्ये दमदार कामगिरी केली. अजिंक्य रहाणे याने अफलातून कामगिरी करत अर्धशतक ठोकलं होतं.
