पाकिस्तान दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकाची सूरूवात खूपच खराब झाली होती.कारण त्यांचा 8 धावांवर 1 विकेट पडला होता. त्यानंतर श्रीलंका सावरेल असे वाटत होते पण त्यांनी 101 धावात 5 विकेट गमावले होते.
ज्यावेळेस श्रीलंकेचे एकामागून एक विकेट पडत होते. ते पाहता पाकिस्तान श्रीलंकेला लवकरच रोखेल असे वाटत होते. पण मैदानात श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाकाच्यी एंन्ट्री झाली होती. ही एंन्ट्री होताच त्याने मॅच फिरवायला सूरूवात केली.
advertisement
दासून शनाकाने शेवटी 31 बॉलमध्ये 76 धावांची नाबाद खेळी केली होती. दासून शनाका ज्यावेळेस मैदानात होता तेव्हा श्रीलंकेला जिंकण्यासाठी खूप धावांची गरज होती आणि बॉल कमी होते. पण दासून शनाका एकट्याचा बळावर मॅच खेचून आणली. शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानला 28 धावांची गरज होती. यावेळी शनाका आफ्रीदला एक चौकार आणि तीन षटकार मारले होते. त्यानंतर 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने वाईट बॉल टाकला तो अंपायरने दिलाच नाही आणि शेवटच्या बॉलवर त्याने पुन्हा कोपऱ्यात बॉल टाकला जो शनाकाला मारला आला नाही आणि श्रीलंकेचा 5 धावांनी पराभव झाला.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान फलंदाजीला उतरले होते. या दोघांनी पाकिस्तानच्या डावाची चांगली सूरूवात करत पहिल्या विकेटसाठी 176 धावांची सर्वाधिक पार्टनरशीप केली होती.ही टी20 वर्ल्डकपमधली आतापर्यतची सर्वाधिक पार्टनरशीप होती.फकर जमानच्या 84 धावा आणि साहिबजादा
फरहानच्या शतकीय खेळीच्या बळावर पाकिस्तानने 212 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य होते.
