क्रिकेट वर्तुळात खळबळ
क्रिकेटरच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहजेब भट्टी असं या खेळाडूचं नाव आहे. शहजेब भट्टी हा गेल्या वर्षी 'कायदे आझम ट्रॉफी' जिंकणाऱ्या टीमचा महत्त्वाचा भाग होता. मात्र, इतकी चांगली कामगिरी करूनही त्याला सतत डावलले गेल्याचा आरोप त्याने केला आहे.
advertisement
सलग 40 मॅचसाठी बेंचवर
सोशल मीडियावर आपली व्यथा मांडताना शहजेबने लिहिलं की, "गेल्या वर्षी मी लाईव्ह टीव्हीवर फायनल जिंकली होती, पण त्यानंतर मला सलग 40 मॅचसाठी बेंचवर बसवून ठेवलं गेलं." या उपेक्षेला कंटाळूनच संन्यास घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. शहजेबने पाकिस्तान क्रिकेटमधील राजकारण आणि भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत.
पाकिस्तान सोडून चाललोय...
पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले स्वप्न सिस्टीममधील त्रुटींमुळे भंग पावलं असल्याचं त्यानं म्हटलं आहे. "राजकारण आणि लचर ढाच्यामुळे माझ्यासारख्या अनेक खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होत आहे, म्हणूनच अनेक खेळाडू आता पाकिस्तान सोडून जात आहेत," असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. पीसीबीवरील अशा आरोपांमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे.
पाकिस्तानच्या गल्लीबोळात टीम इंडियाची चर्चा
दरम्यान, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये खालच्या आवाजात कौतुक होताना दिसतंय. तर वरून वरून पाकिस्तानमध्ये सन्नाटा दिसत आहे. पाकिस्तानच्या गल्लीबोळात अभिषेक शर्मा आणि जसप्रीत बुमराहचं कौतुक होत असल्याचं पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टमधून समोर येतंय.
