दरम्यान शिवम दुबे पहिल्यांदा वर्ल्डकप विजयानंतर मुंबईत येताना कसा आला? याची माहिती दिली आहे.वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मला घरी जायची घाई झाली होती. घरी जाऊन मला मुलं आणि वडिलांना भेटायचं होतं, त्यामुळे मी सकाळीच घरासाठी रवाना झालो. कधी एकदा घरी पोहोचतोय, असं मला झालं, असं शिवम दुबे म्हणाला आहे.
मी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी फ्लाईट तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, पण अहमदाबादवरून मुंबईला जाणारी सगळी फ्लाईट फूल होती, त्यामुळे मी ट्रेनने जायचा निर्णय घेतला. मी कारनेही मुंबईला पोहोचू शकलो असतो, पण ट्रेन जास्त लवकर पोहोचते म्हणून मी ट्रेनने निघालो, असं वक्तव्य दुबेने केलं आहे.
advertisement
शिवम दुबे त्याची पत्नी आणि एका मित्रासह थ्री टियर एसी कोचमधून ट्रेनने मुंबईमध्ये आला.शिवम दुबेच्या या निर्णयामुळे त्याचं कुटुंब आणि मित्रही थोडे चिंतेत होते.स्टेशन किंवा ट्रेनवर कुणी ओळखलं तर काय होईल? अशी भीती शिवम दुबेच्या कुटुंबाला वाटत होती.
चाहत्यांच्या गर्दीपासून वाचण्यासाठी शिवम दुबेने कॅप, मास्क आणि फूल स्लीव्हचा टी-शर्ट घातला होता, त्यामुळे त्याला कुणीच ओळखू शकलं नाही. अहमदाबादवरून दुबेने पहाटे 5.10 ची ट्रेन पकडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी असेल. ट्रेन सुटायच्या 5 मिनीट आधीपर्यंत मी कारमध्ये बसलो होतो आणि पटकन ट्रेनमध्ये चढलो, असं दुबेने सांगितलं आहे.
दरम्यान मागच्या अनेक दिवसांपासून शिवम दुबेच्या या स्टोरीची प्रचंड चर्चा आहे.असे असताना यावर टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज शिवम दुबेने संताप व्यक्त केला आहे. शिवम दुबेने ट्रेनने प्रवास केल्याच्या बातम्या मी पाहत आहे.मला तशा बातम्या वाचायच्या नाहीत. त्यात एवढं काय विशेष आहे? मी स्वतः ट्रेनने प्रवास केला आहे, अशा शब्दात त्याने दुबेला सुनावलं आहे.
तसेच मला खूप आवडेल की, आपल्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना चहावाल्यांकडे जाऊन लोकांसोबत चहा पिता यावा. खरं तर, आपण हेच विसरलो आहोत की आयुष्यातील आनंद हा खूप छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो, असे अश्विन म्हणाला आहे.
