टी-20 वर्ल्ड कप टीमची घोषणा होईपर्यंत जितेश शर्मा भारतीय टीमचा भाग होता, पण इशान किशनची टीम इंडियात एन्ट्री झाली आणि संजू सॅमसन हादेखील विकेट कीपर असल्यामुळे जितेशला वर्ल्ड कप टीममधून बाहेर केलं गेलं. जितेशने काहीही चूक केली नाही, पण टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये एक विकेट कीपर हवा होता, त्यामुळे जितेशला बाहेर करावं लागल्याची प्रतिक्रिया अजित आगरकरने दिली होती.
advertisement
जितेशच्या वडिलांचं निधन
'मला जेव्हा बातमी कळाली तेव्हा वाईट वाटलं, मीदेखील माणूसच आहे. पण वेळ जसा पुढे गेला तसा माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला पाठिंबा दिला, त्यामुळे वाईट काळ छोटा होता. नंतर माझे वडील आजारी पडले आणि 1 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. मी 7 दिवस त्यांच्यासोबत होतो. माझ्या वडिलांना वर्ल्ड कपपेक्षा मी जास्त हवा होतो', असं जितेश शर्मा म्हणाला आहे.
'मला कोणाबद्दलही दुःख किंवा पश्चात्ताप नाही. मी रागावलो नाही. देवाने मला माझ्या वडिलांसोबत 7 दिवस राहण्याची संधी दिली याबद्दल मी आभारी आहे. मी त्यांची काळजी घेऊ शकलो. मला घरी राहून वर्ल्ड कप पाहू शकलो. टीव्हीवरून वर्ल्ड कप पाहणे खूप वेगळे आहे. मी खेळाडूंसाठी खूप आनंदी आहे कारण आशिया कपपासून प्रशिक्षक आणि कॅप्टनने स्वप्न पाहिलं होतं, त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि त्यांनी या ध्येयासाठी खूप मेहनत घेतली आहे', अशी प्रतिक्रिया जितेश शर्माने दिली.
