450 रन्सचा टप्पा पार
सरफराज खानच्या या वादळी खेळीमुळे मुंबईच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 450 रन्सचा टप्पा पार केला आहे. सरफराजने मॅचच्या पहिल्याच दिवशी आपले शतक पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशीही त्याने आपली लय कायम राखली. ताज्या माहितीनुसार, तो 218 बॉल्समध्ये 227 रन्सवर खेळत असून सुवेद पारकर त्याला 65 रन्सवर मोलाची साथ देत आहे. या खेळीने त्याने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
advertisement
मोहम्मद सिराज टॉस जिंकला
या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन मोहम्मद सिराज याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईची सुरुवात तशी अडखळती झाली. अखिल हरवाडकर आणि आकाश आनंद यांनी 60 रन्सची ओपनिंग पार्टनरशिप केली खरी, पण अखिल 27 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर लगेचच आकाशही 35 रन्सवर माघारी परतला आणि मुंबईची अवस्था 2 विकेट्सवर 66 रन्स अशी झाली.
छोटा भाऊ फेल
मुंबईला तिसरा धक्का मुशीर खानच्या रूपाने बसला, जो केवळ 11 रन्स करून माघारी परतला. 82 रन्सवर 3 महत्त्वाच्या विकेट्स गेल्याने मुंबई दबावाखाली आली होती. मात्र, इथून सिद्धेश लाड आणि सरफराज खान यांनी सूत्रे आपल्या हातात घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 249 रन्सची ऐतिहासिक पार्टनरशिप केली. सिद्धेश लाड 104 रन्सची शतकी खेळी करून आऊट झाला, पण तोपर्यंत मुंबईने मजबूत पकड मिळवली होती.
हैदराबादचे बॉलर हतबल
मॅचच्या पहिल्या दिवशी सरफराजने 164 बॉल्समध्ये 5 सिक्स आणि 11 फोरच्या मदतीने नाबाद 142 रन्स केले होते. हैदराबादकडून बॉलिंग करताना सिराज आणि नितीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली, तर रोहित रायुडू याने 2 बॅट्समनना आऊट करण्यात यश मिळवले. मात्र, सरफराजच्या आक्रमक खेळीसमोर हैदराबादचे बॉलर हतबल दिसले. सरफराजने पुन्हा एकदा आपण मोठ्या इनिंगचा खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे.
