सात वर्षांचा संसार मोडला
ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने (Saina Nehwal) तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला आहे. सानियाने रात्री सुमारे 11.30 वाजता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि खळबळ उडवून दिली. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण हे नाते फक्त सात वर्षेच टिकले. 35 वर्षांच्या सायनाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून पतीसोबत वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला.
advertisement
इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट
सायनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, "जीवन कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे आमच्यासाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि समाधान निवडत आहोत."
घटस्फोटाचं कारण काय?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोघांच्या वेगळे होण्याबद्दल कोणतीही चर्चा किंवा अफवा नव्हत्या. त्यामुळे यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सायनाने पुढे लिहिले, "मी या आठवणींसाठी नेहमीच आभारी राहीन आणि पुढे जाताना फक्त चांगल्याचीच अपेक्षा करते. अशा वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि ती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद."
सायनाचे ऑलिम्पिकमधील यश आणि कश्यपचे कॉमनवेल्थमधील सुवर्णपदक
सायना नेहवालने (Saina Nehwal) 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उज्वल केले होते. त्यानंतर 2015 मध्ये सायनाने वर्ल्ड बॅडमिंटन क्रमवारीत पहिले स्थान पटकावून इतिहास रचला आणि जगातील नंबर वन शटलर बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. दुसरीकडे, पी. कश्यपने (P. Kashyap) 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. अशातच आता दोन्ही खेळाडूंनी आपल्या करियरला प्राधान्य देत घटस्फोट घेतला आहे.