"ग्रुप ऑफ डेथ" मध्ये टीम इंडिया
ग्रुप 1 मधील या चारही टीम एकही सामना न गमावता सुपर-8 मध्ये पोहोचल्या आहेत. पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियाला हरवून भारताने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटकावले. ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने जिंकले. ग्रुप सी मध्ये वेस्ट इंडिजनेही सलग चार विजय नोंदवले. दरम्यान, ग्रुप बी मध्ये तीन विजय आणि एक अनिर्णित सामन्यासह झिम्बाब्वे अपराजित राहिली.
advertisement
टीम इंडियाला इतिहास बदलावा लागणार
सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक टीमला त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवावी लागेल, पण टीम इंडियासाठी हा प्रवास सोपा नसेल. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे उत्तम फॉर्ममध्ये आहेत. तर वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला इतिहास बदलावा लागणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त एकच मॅच जिंकता आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम चार वेळा एकमेकांसमोर आल्या आहेत, ज्यात वेस्ट इंडिजचा 3 वेळा आणि भारताचा एकदा विजय झाला आहे.
सुपर-8 मध्ये भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना हा सगळ्यात शेवटी 1 मार्चला होणार आहे. तर भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 फेब्रुवारी आणि झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 26 फेब्रुवारीला होईल. ग्रुप 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. सुपर-8 च्या दोन ग्रुपमधील टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेल्या दोन टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळेल.
