टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला पण आता पुढचे चार महिने तरी टीम इंडिया टी20 सीरीज खेळताना दिसणार नाही आहे. कारण 28 मार्चपासून आयपीएलला सूरूवात होत आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच टीम इंडिया लगेचच अफगाणिस्तानसोबत एक टेस्ट आणि तीन वनडे सीरीज खेळताना दिसणार आहे.त्यानंतर भारत त्यांची पुढची टी20 सीरीज खेळणार आहे.
टी20 सीरीज कधी?
advertisement
टीम इंडियाची पुढची टी20 सीरीज आता जुलैमध्ये आहे.भारतीय संघ 1 जुलै ते 19 जुलै 2026 दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला पाच टी20 सामने खेळाले लागणार आहेत. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. त्यामुळे आता टीम इंडियाची वर्ल्ड कप विजेती टीम आता जुलैमध्ये मैदानात उतरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे जे खेळाडू टी20 खेळतात, त्यांनाच आता टी20 संघात एंन्ट्री होणार आहे.
भारत-इंग्लंड दौऱ्याच संपूर्ण वेळापत्रक
टी20 मालिका
पहिला टी20 : 1 जुलै 2026,चेस्टर ली स्ट्रीट (रात्री 11 वाजता)
दुसरा टी20 : 4 जुलै 2026,मॅचेस्टर (रात्री 8 वाजता)
तिसरा टी20 : 7 जुलै 2026,नॉटीघम, (रात्री 12 वाजता)
चौथा टी20 : 9 जुलै 2026, ब्रिस्टॉल (रात्री 12 वाजता)
पाचवा टी20 : 11 जुलै 2026,साउथैम्पटन (रात्री 12 वाजता)
वनडे मालिका
पहिला वनडे : 14 जुलै 2026, बर्मिगम, (संध्याकाळी 6.30 वाजता)
दुसरा वनडे : 16 जुलै 2026, कार्डिफ, (संध्याकाळी 6.30 वाजता)
तिसरा वनडे : 19 जुलै 2026, लंडन (संध्याकाळी 4.30 वाजता)
इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या सामन्याच्या वेळापत्रक जाहीर झालं नाही आहे.
