टीम इंडियाने दिलेल्या 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण अक्षर पटेलने न्यूझीलंडचा घातक फलंदाज असलेल्या फिन अॅलेनला 9 धावांवर स्वस्तात बाद केले होते. त्याच्यानंतर रचिन रविंद्र मैदानात आला होता.पण बुमराह समोर त्याचाही निभाव लागला नाही आणि तो एक धावा करून बाद झाला.
अक्षर पटेलने पुन्हा स्ट्राईक घेऊन ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद केले होते. त्यानंतर आलेल्या मार्क चॅपमन 3 वर बाद झाले होते. टीम सिफर्ट एकटा न्यूझीलंडचा डाव सावरून होता, पण वरुन चक्रवर्तीने त्याला 52 धावांवर बाद केले होते. दरम्यान न्यूझीलंडचे 5 विकेट पडल्यानंतर डेरी मिचेल आणि कॅप्टन मिचेल सँटनरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण अक्षरने मिचेलला 17 वर बाद केले आणि नंतर बुमराहने मिचेल सँटनरला क्लिन बोल्ड करत 43 धावांवर बाद केले. या विकेटनंतर बुमराहने विकेटची रांगच लावली.
advertisement
बुमराहने नंतर जीमी निशम आणि मॅट हेन्रीला झटपट बाद केले.त्यानंतर अभिषेकने जेकॉब डफीची विकेट काढून न्यूझीलंडला 159 धावांवर ऑलआऊट करत हा सामना 96 धावांनी जिंकला होता.
दरम्यान या विजयानंतर सु्र्या एक गोष्ट करायला अजिबात विसरला नाही. तो पीचवर गेला आणि त्याने मैदानात झूकून आपल्या हाताने मातीला स्पर्ष केला. नंतर तीच माती आपल्या कपाळाला लावली. त्यामुळे अशाप्रकारे ज्या मातीने म्हणजेच ज्या मैदानाने त्याला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं त्या मातीला स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली होती.
हीच गोष्ट रोहित शर्माने देखील मागचा टी20 वर्ल्डकप जिंकल्यावर केली होती.रोहितने त्यावेळी वर्ल्डकप जिंकल्यानंतर मातीला स्पर्श करत ती चाखली होती.अशाप्रकारने त्याने मैदाना प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.
