भारताने हा सामना जिंकून तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच याआधी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नव्हते.पण भारताने आज ही किमया करून दाखवली आहे. यजमान टीमला आतापर्यंत वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. पण भारताने ही गोष्ट अहमदाबादच्या मैदानावर करून दाखवली आहे.
दरम्यान या विजयानंतर प्रत्येक खेळाडूने आपआपली प्रतिक्रिया दिली होती. त्यात संजू सॅमसनने मोठा खूलासा केला आहे.खरं तर या वर्ल्ड कपच्या सूरूवातीपासून संजू आऊट ऑफ फॉर्म होता.त्याच्या बॅटीतून धावाच निघत नव्हत्या.त्यामुळे तो प्रचंड निराश होता.ग्रुप स्टेजमध्ये त्याला दोनच सामने खेळायची संधी मिळाली.पण त्याला मोठ्या धावा करता आल्या नाही.त्यामुळे तो निराश झाला होता.
advertisement
पण यानंतर अभिषेक शर्मा देखील फ्लॉप ठरत असल्याने संजूची अचानक एंन्ट्री झाली. या एंन्ट्रीनंतर संजूने जो कमबॅक केला तो बघण्यासारखा होता. कारण त्याने वेस्ट इंडिज विरूद्ध 97 धावांची खेळी केली. त्यानंतर सेमी फायनल सामन्यात त्याने 89 धावांची खेळी केली. आणि आज फायनल सामन्यात त्याने 89 धावांची खेळी केली. संजूच्या याच धावांच्या बळावर टीम इंडिया वर्ल्ड कप विजेती झाली.
संजूच्या या संपूर्ण खेळीच श्रेय सचिन तेंडुलकरला जाते. कारण मॅच नंतर बोलताना संजू म्हणाला, गेल्या काही महिन्यांपासून, मी सचिन सरांशी सतत संपर्कात होतो. या दरम्यान मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी मोठ्या गप्पा मारल्या. त्यांच्यासारख्या एखाद्याकडून मार्गदर्शन मिळाल्याने माझ्या खेळात सुधार झाला.
दरम्यान यात सचिन तेंडुलकरला मानलं पाहिजे कारण घरात मुलगा अर्जुन तेंडुलकरची लगीनघाई असताना देखील तो संजूच्या मदतीला धावला आणि त्याने त्याला मोलाच मार्गदर्शन केले आणि त्याच्या खेळात मोठा सूधार झाला.त्यामुळे संजूच्या या कामगिरीचे संपूर्ण श्रेय सचिन तेंडुलकरला जाते.
