भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांचा समाचार पहिल्या ओव्हरपासून घेण्यास सुरुवात केली होती. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानी आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले. मात्र सामना पुन्हा पाकिस्तानकडे वळण्याची एक संधी उस्मान खानच्या इनिंगमुळे निर्माण झाली होती.
सामन्यातला टर्निंग पॉइंट
उस्मान खान मैदानावर फार काळ शांत पाहिला नव्हता. तो सेट झाला आणि 34 चेंडूत 44 धावा करीत पाकिस्तानाला टार्गेट “चेस” करुन देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानला विजयाची आशा दिसत होती. परंतु 11व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर त्याची विकेट मिळाली आणि मॅच भारताच्या बाजूने फिरली. त्याला अक्षर पटेलने बाद केले. उस्मान बाद झाला तेव्हा पाकिस्तानी अवस्था 5 बाद 73 होती. तो बाद झाल्यानंतर पाकचा डाव कोसळला.
advertisement
भारताने ही मॅच 61 धावांनी जिंकली आणि सुपर 8 मधील स्थान निश्चित केले. आता टीम इंडियाची अखेरची ग्रुप फेरीतील लढत नेदरलँडविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे सर्वात मोठे पराभव (धावांच्या फरकाने)
84 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, मीरपूर 2014
61 धावा विरुद्ध भारत, कोलंबो RPS 2026*
48 धावा विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल 2009
T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सर्वात कमी धावसंख्या
82 विरुद्ध वेस्ट इंडिज, मीरपूर 2014
113/7 विरुद्ध भारत, न्यूयॉर्क 2024
114 विरुद्ध भारत, कोलंबो RPS 2026*
123/7 विरुद्ध श्रीलंका, कोलंबो RPS 2012
T20 वर्ल्ड कपमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय
8* भारत विरुद्ध पाकिस्तान (एक सुपर ओव्हर विजय समाविष्ट)
6 ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
6 पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
6 श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज
6 वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
