TRENDING:

Vijay Hazare Trophy : विराट कोहलीला मोठा धक्का! दिल्ली विरुद्ध कर्नाटक सामना अचानक रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Last Updated:

Vijay Hazare Trophy Delhi vs Karnataka : सुरक्षेच्या कारणास्तव ही मॅच न घेण्याचा निर्णय समितीने घेतला असून, यामुळे विराटला मैदानात पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Chinnaswamy Stadium Match called off : आपल्या मेहनतीच्या जोरावर विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे किंग कोहलीची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात आहे. अशातच आता कोहलीच्या याच फॅन फॉलोविंगमुळे एक मॅच रद्द करण्याची वेळ आलीये. दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफीची मॅच प्रशासकीय कारणांमुळे आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून रद्द करण्यात आली. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच होणार होती, ज्यामध्ये विराट कोहली दिल्लीकडून खेळणार होता. मात्र, तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही मॅच न घेण्याचा निर्णय समितीने घेतला असून, यामुळे विराटला मैदानात पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झालाय.
Chinnaswamy stadium called off Due to Virat Kohli
Chinnaswamy stadium called off Due to Virat Kohli
advertisement

रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा प्रस्ताव

विराट कोहली सध्या बंगळुरूमध्ये असून त्याने या मॅचसाठी सराव देखील सुरू केला होता. विशेष म्हणजे, ही मॅच प्रेक्षकांशिवाय म्हणजेच रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा प्रस्ताव होता, तरीही समितीने त्याला मान्यता दिली नाही. भारतीय संघाच्या आगामी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर, कोहलीचा हा सराव महत्त्वाचा मानला जात होता, पण आता ही मॅच होणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

advertisement

विशेष परवानगी मागितली होती पण...

स्टेडियममधील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. जीबीए आयुक्त महेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्टेडियममधील सद्यस्थिती मॅचसाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. केएससीएने (KSCA) ही मॅच आयोजित करण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली.

advertisement

चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू

या निर्णयाला जून महिन्यातील एका दुर्दैवी घटनेची पार्श्वभूमी आहे. आयपीएल विजयाच्या जल्लोषात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने स्टेडियमवर मोठे कार्यक्रम घेण्यास निर्बंध घातले आहेत. तेव्हापासून या ऐतिहासिक मैदानावर एकही स्पर्धात्मक मॅच झालेली नाही.

विजय हजारे ट्रॉफीच्या वेळापत्रकात मोठा बद

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी सरकार आणि गृहविभागाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र समितीने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आपला निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे विजय हजारे ट्रॉफीच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vijay Hazare Trophy : विराट कोहलीला मोठा धक्का! दिल्ली विरुद्ध कर्नाटक सामना अचानक रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल