advertisement
पहिल्या तीन ओव्हरमध्येच पलटणचा गेम
कागदावर कमकुवत वाटणारी राजस्थानची टीम पूर्ण बॅकअप प्लॅनसह मैदानात उतरली होती. वैभव आणि यशस्वीच्या अफलातून खेळीमुळे राजस्थानने 11 ओव्हरमध्ये 150 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यामुळे मुंबईवर मोठे प्रेशर दिसून येत होतं. त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या तीन ओव्हरमध्येच पलटणचा गेम झाला. अपेक्षेप्रमाणे रियानने आर्चरला पहिली ओव्हर दिली अन् आर्चरने आपलं काम चोखपणे बजावलं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आर्चरने रिकल्टनला माघारी पाठवलं अन् पहिला ठोका वाजला.
सूर्याला फेरवेट शॉटमध्ये अडकवलं
त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्या मैदानात येताना पाहून रियानने लगेच प्लॅन चेंज केला अन् आंद्रे बर्गर याला बॉल सोपवला. बर्गर याने सूर्याला त्याच्या फेरवेट शॉटमध्ये अडकवला. डीप बॅक स्वेअर लेगवर सूर्याने कॅच सोपवला. त्यामुळे मुंबईला आता दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्या होत्या. दुसरा ठोका पडला पण राजस्थानसाठी सर्वात मोठी अडचण होती, मुंबईच्या मॅचविनरची... रोहित शर्मा अजूनही मैदानात होता. त्याचवेळी रियानने हुकमी एक्का काढला.
हिटमॅनने 12 मॅचमध्ये 5 वेळा आऊट
रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असताना रिस्क घेऊन रियान परागने असा बॉलर आणला ज्याने हिटमॅनने 12 मॅचमध्ये 5 वेळा आऊट करून दाखवलं होतं. रोहित शर्मा त्याच्यासमोर तसाच अडखळतो, जसा तो डेल स्टेनसमोर गडबडला होता. रियान परागने संदीप शर्माला बॉलिंग दिली. संदीपचा रेकॉर्ड रोहितसमोर तगडा, त्यामुळे रोहितने देखील हळूच खेळण्याचं ठरवलं. पण संदीपच्या एका स्लोअर बॉलवर हिटमॅन फसला. रोहित शर्मा स्विप शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण बॉल बॅटला लागलाच नाही. अशाप्रकारने संदीप शर्माने सहाव्यांदा रोहित शर्माची विकेट काढली.
मुंबईचं मनोबल तोडलं अन् मॅच जिंकली
दरम्यान, पहिल्या तीन विकेट गेल्यानंतर मुंबई कोलमडून गेली. त्यानंतर रवी बिश्नोईने हार्दिक आणि तिलकला माघारी पाठवल्यानंतर रदरफोर्ट देखील जास्त काही करू शकला नाही. पहिल्या तीन ओव्हरमध्ये राजस्थानने मुंबईचं मनोबल तोडलं अन् मुंबईने हातातली मॅच गमावली.
