टीम कल्चर रूजवण्याचा प्रयत्न
आम्ही गेल्या 18 महिन्यापासून टीम कल्चर रूजवण्याचा प्रयत्न करत होतो. टीममध्ये चेंजमध्ये काहीच उरलं नव्हतं. मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी, शेवटच्या क्षणी हॉटेल बदलण्यात आलं. "आम्ही सेमीफायनल सामन्यासाठी फ्लाइटमध्ये होतो तेव्हा कोणीतरी नवीन हॉटेल वापरून पाहण्याचा सल्ला दिला. अनेक संघांनी असं केलं आहे. आम्हाला आमच्या ध्येयाच्या जवळ नेणारी कोणतीही गोष्ट टेबलावर ठेवायची नव्हती, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
स्टेडियममध्ये कोणतीही अडचण नाही
ज्या स्टेडियमवर 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता आणि जिथे या टीमला संघर्ष करावा लागला होता, त्याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांनी अखेर ट्रॉफी जिंकली. "आता आम्हाला खात्री पटली आहे की, स्टेडियममध्ये कोणतीही अडचण नाही," असे सूर्या म्हणाला. या प्रवासातील महत्त्वाचे वळण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये आलेल्या कठीण प्रसंगानंतर आलं. त्यावेळी मी टीमचा अनुभवी ऑल-राउंडर हार्दिक पांड्याला जबाबदारी सोपवली होती, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
पुन्हा नव्या जोशाने मैदानात
दरम्यान, टीम इंडिया ज्याप्रकारे वर्ल्ड कप खेळली, त्याचा मला अभिमान आहे. आम्ही कोणत्याही क्षणी डगमगलो नाही. साऊथ अफ्रिकेच्या पराभवानंतर सर्व खेळाडू पुन्हा विजयासाठी तयार झाले. पांड्या सर्वांमध्ये स्पुर्ती निर्माण केली. त्यामुळे खेळाडू पुन्हा नव्या जोशाने मैदानात उतरले अन् टीम इंडियाच्या संघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवता आला, असं सूर्य़कुमार यादव म्हणाला आहे.
