TRENDING:

ट्रेनमध्ये मोबाईल हरवला? डोंट वरी, सरकारने सांगितलेल्या ट्रिकने लगेच मिळेल

Last Updated:

Smartphone Lost in Train: तुम्ही प्रवासादरम्यान ट्रेन किंवा स्टेशनवर तुमचा मोबाईल फोन हरवला किंवा चोरी गेला तर तो परत मिळण्याची आशा खुप जास्त वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही प्रवासादरम्यान ट्रेन किंवा स्टेशनवर तुमचा मोबाईल फोन हरवला किंवा चोरी गेला तर आता तो परत मिळण्याची आशा जास्त वाढली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे सुरक्षा दल आणि दूरसंचार विभाग (DoT) ने मिळून एक मोठं पाऊल उचललं आहे.
ट्रेन फोन
ट्रेन फोन
advertisement

RPF CEIR पोर्टलशी जोडले गेले, रिकव्हरी झाली सोपी 

आरपीएफ आता अधिकृतपणे दूरसंचार विभागाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलशी जोडले गेले आहे. हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइल फोनचा आयएमईआय नंबर ब्लॉक करण्यास अनुमती देते. यामुळे फोन केवळ निरुपयोगीच होत नाही तर तो ट्रॅक करणे देखील सोपे होते.

advertisement

ईशान्य सीमावर्ती रेल्वेवरील या प्रणालीचा पायलट प्रकल्प आधीच यशस्वी झाला आहे. आता, तो संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे लाखो प्रवाशांना थेट फायदा होत आहे.

Train Fact : ट्रेन वळण घेताना किंवा धावताना रुळांवरून उतरत का नाही? यामागे नेमकं काय सायन्स असतं?

रेल्वे सुरक्षेत डिजिटल टेक्नॉलॉजीने मोठी झेप घेतली आहे. सीईआयआर पोर्टलच्या लाँच आणि प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान, आरपीएफचे महासंचालक मनोज यादव म्हणाले की, दूरसंचार विभागासोबतची ही भागीदारी रेल्वे सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर प्रवाशांना मोबाईल रिकव्हरीची पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धत प्रदान करेल, ज्यामुळे रेल्वेवरील जनतेचा विश्वास आणखी दृढ होईल.

advertisement

IMEI ब्लॉक होता फोन होईल निरुपयोगी 

CEIR पोर्टलच्या माध्यमातून RPF आता हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल फोनचा IMEI नंबर तत्काळ ब्लॉक करु शकेल. असं झाल्यास फोनचा वापरलाही जाऊ शकणार नाही आणि अवैधरित्याही विकला जाऊ शकणार नाही. यासोतबच फोन कोणत्याही नवीन सिम कार्डसह नेटवर्कवर अॅक्टिव्ह असेल, त्याची माहिती सिस्टमला मिळेल.

advertisement

Indian Railway : ट्रेनमधील साखळी ओढताच ब्रेक कसे लागतात? ती ओढली तर नेमकं काय होईल असा प्रश्न तुमच्या पण मनात येतो ना? मग हे वाचा

ऑपरेशन अमानतपूर्वीही RPFचा आत्मविश्वास दिसून आला

आरपीएफ प्रवाशांना हरवलेले सामान परत करण्यासाठी आधीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ऑपरेशन अमानत अंतर्गत, जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान, आरपीएफने 84 कोटींहून अधिक किमतीच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या आणि त्या 1.15 लाखांहून अधिक प्रवाशांना परत केल्या. CEIRच्या समावेशासह, मोबाईल फोन रिकव्हरी आणखी जलद आणि अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

मोबाईल हरवल्यावर कुठे आणि कशी करावी तक्रार 

ट्रेन प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही Rail Madad प्लेटफॉर्मवर ऑनलाइन तक्रार दाखल करु शकता किंवा 139 वर कॉल करु शकता. तुम्ही FIR दाखल केला नाही तर तुम्हाला CEIR पोर्टललवर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली जाईल.

फोन परत मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सुरू राहते

तक्रार दाखल झाल्यानंतर, आरपीएफचा झोनल सायबर सेल सीईआयआर पोर्टलवर मोबाईलची माहिती प्रविष्ट करून त्याचा आयएमईआय ब्लॉक करतो. नवीन सिमसह फोन परत मिळाल्यानंतर, यूझरला जवळच्या आरपीएफ पोस्टवर फोन परत करण्यास सांगितले जाते. मूळ मालक आवश्यक कागदपत्रे सादर करून त्यांचा फोन परत मिळवू शकतो.

तुम्हाला कोणी सहयोग केला नाही तर एफआयआर दाखल करुन प्रकरण जिल्हा पोलिसांना सोपवला जातो. फोन सापडल्यानंतर मालक CEIR पोर्टल च्या माध्यमातून IMEI अनब्लॉक करण्याची विनंतीही करु शकता.

या देशभरातील अंमलबजावणीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गणेश जयंतीला बनवा उकडीचे मोदक, या पद्धतीनं अजिबात नाही फुटणार, रेसिपीचा Video
सर्व पहा

मे 2024 मध्ये सुरू झालेल्या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर, ही सुविधा आता देशभरात लागू करण्यात आली आहे. आरपीएफचा असा विश्वास आहे की या उपक्रमामुळे केवळ मोबाईल चोरीला आळा बसणार नाही तर प्रवाशांना त्यांचे फोन जलद आणि सुरक्षितपणे परत मिळविण्यात देखील मदत होईल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ट्रेनमध्ये मोबाईल हरवला? डोंट वरी, सरकारने सांगितलेल्या ट्रिकने लगेच मिळेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल